भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2 -1 ने विजय मिळवला आहे. भारताच्या या यशात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने महत्त्वाची भूमिका पार पाडली. पुजाराने ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आपल्या शरीरावर अनेक जखमा घेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. पुजाराच्या या अविश्वसनीय खेळीबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वाडून त्याचे कौतुक केले जात आहे.
पुजारासाठी मात्र ही खेळी फारच वेदनादायी ठरली. अनेक वेळा चेंडू त्याच्या शरीरावर आदळल्याने तो दुखापतग्रस्त जाणवत होता. मालिका संपल्यानंतर नुकतीच पुजाराची प्रतिक्रिया समोर येत असून, त्याने दुखापतीची तीव्रता स्पष्ट केली आहे.
पुजारा एका मुलाखीदरम्यान म्हणाला, ‘बोटाला झालेल्या दुखापतीमुळे मला फलंदाजी करणे अवघड जात होते. मला वेदना होत होत्या. मेलबर्न येथे सरावादरम्यान देखील मला दुखापत झाली होती. जेव्हा मी ब्रिस्बेन येथे फलंदाजी करत होतो तेव्हा मला बॅट व्यवस्थितपणे पकडता येत नव्हती. ब्रिस्बेन येथे जेव्हा चेंडू माझ्या बोटाला लागला तेव्हा माझ्या वेदना प्रचंड वाढल्या. मी केवळ चार बोटांत बॅट पकडत होतो. जे माझ्यासाठी सामान्य नव्हते.”
दरम्यान पुजाराच्या कामगिरीचा विचार केला असता, त्याने ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी शानदार अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे पुजाराने तब्बल 211 चेंडू खेळून काढत 7 चौकरांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. पुजराच्या या खेळीमुळेच शुभमन गिल व रिषभ पंत यांना आक्रमक खेळी करण्याची संधी मिळाली व भारतीय संघ इतिहास रचत सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
गोलंदाजाला चौकार पडल्यानंतर रवी शास्त्री माझ्यावर ओरडतात, भरत अरुण यांनी उलगडले गुपित
चेन्नई कसोटीद्वारे होणार हार्दिक पंड्याचे पुनरागमन, ‘इतक्या’ वर्षांपुर्वी खेळला होता शेवटचा सामना
गोलंदाजी प्रशिक्षक भरुत अरुण यांनी दिली माहिती, ‘अशाप्रकारे’ ओळखले सिराजचे कौशल्य