आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आगामी 2023 विश्वचषकावेळी एक मोठा बदल करणार असल्याचे म्हटले जात आहे. नव्या बदलानुसार विश्वचषकामध्ये 10 ऐवजी 14 संघांना सहभागी केले जावू शकते. सध्या चर्चा सुरू आहे की 16 संघ सहभागी करावे अथवा नाही, पण 14 संघांसाठीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पूर्वी 2003, 2011 व 2015 विश्वचषकावेळी 14 संघांना संधी देण्यात आली होती. मात्र 2019 वेळी केवळ 10 संघच क्रिकेटच्या या मोठ्या स्पर्धेत सहभागी झाले होते. 10 संघात झालेल्या या विश्वचषकावर अनेक माध्यमांनी नाराजी व्यक्त केली होती. विश्वचषकात सहभागी होण्यास अपात्र ठरलेल्या अनेक संघांनी या नव्या प्रारुपाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
मागील अनेक दिवसांपासून आयसीसी अनेक प्रकारच्या चर्चेमध्ये या मुद्द्याबद्दल देखील चर्चा करत आहे. क्रिकेटच्या प्रसारासाठी जास्त संघांना संधी देणे हिताचे असेल असाही सल्ला आयसीसीला मिळत असल्याचे म्हटले जात आहे. केवळ 2023 च नाही तर 2027 व 2031 विश्वचषकासाठी देखील हा नियम लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. काही सदस्यांची मागणी होती की 2007 प्रमाणे 16 संघाना संधी देण्यात यावी, मात्र त्याबाबत एकमत झाले नाही.
दरम्यान विश्वचषक क्रिकेटचा इतिहास विचारता घेतला असता याची सुरुवात 1975 झाली झाली. 4 वर्षांच्या अंतराने होणाऱ्या या स्पर्धेला क्रिकेट मधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानले जाते. विश्वचषक इतिहासात ऑस्ट्रेलिया हा सर्वात यशस्वी संघ ठरलेला आहे. त्यांनी 1987, 1999, 2003, 2007 व 2015 अशा 5 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. यानंतर वेस्ट इंडिज (1975, 1979) व भारत (1983, 2011) यांचा क्रमांक येतो. 2 वर्षांपूर्वी पार पडलेल्या 2019 विश्वचषकात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत पहिल्यांदाच जेतेपदावर आपले नाव कोरले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरविरुद्ध निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळणार आरसीबी, कारण वाचून कराल कौतुक