यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ आमने-सामने असणार आहेत. शनिवार (29 जून) रोजी हा सामना रंगणार आहे. बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात फायनल सामना खेळला जाणार आहे. भारत रोहित शर्माच्या तर दक्षिण आफ्रिका एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी या दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल जाणून घेऊया.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका 26 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये भारतानं 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 11 सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेनं भारताविरुद्ध 11 सामने जिंकले आहेत. तर 14 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचं पारडं जड आहे.
त्यामध्ये टी20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संंघ 6 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारतानं 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिका 2 सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी राहिला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि टी20 विश्वचषकात भारताचं वर्चस्व राहिलं आहे.
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात भारतानं चमकदार कामगिरी केली आहे. भारतानं या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावला नाही. 8 पैकी 7 सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. शेवटच्या सामन्यात भारतानं 68 धावांनी इंग्लंडला धूळ चारुन फायनलमध्ये धडक मारली.
दक्षिण आफ्रिकेनं यंदाच्या टी20 विश्वचषकात सलग 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रकेनं या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा पराभव करुन फायनलमध्ये धडक मारली. दक्षिण आफ्रिका संघही या स्पर्धेत अपराजित आहे. फायनलमध्ये जो संघ बाजी मारणार त्या संघाच्या नावावर एकही सामना न गमावता टी20 विश्वचषक जिंकल्याचा रेकाॅर्ड होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
2 वर्षांपूर्वी जेव्हा भारत इंग्लंडकडून हरला, दिनेश कार्तिकने सांगितली पराभावनंतरची कटू व्यथा
रनमशीन मानधना! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्म्रीती मानधनाचं शानदार शतक
IND vs SA फायनलमध्ये पावसाचा धोका, राखीव दिवसही वाहून गेला तर ट्रॉफी कोणाची? जाणून घ्या संपूर्ण गणित