भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे म्हणणे आहे की जर अॅडलेड मध्ये दिवस-रात्र होणारा सामना भारतीय संघ जिंकला नाही तर विराट कोहली माघारी आल्यावर उर्वरित मालिकेसाठी संघाच्या अडचणीत वाढ होईल.
भारतीय संघ कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 17 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर चषकात ऑस्ट्रेलियन संघाशी दोन हात करेल. मालिकेतील पहिला सामना गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळला जाणार आहे. कुंबळेना वाटते की हा सामना भारतीय संघासाठी सर्वात जास्त आव्हानात्मक असणार आहे. कारण मालिकेतील पहिला सामना खेळाडूंसाठी महत्वाचा ठरतो.
“पहिला सामना असेल महत्वाचा”
नुकत्याच एका कार्यक्रमात अनिल कुंबळे म्हणाले, “जर पहिल्या सामन्यात आपण विजय मिळवू शकलो तर मग भारतीय संघाकडे त्याची पुनरावृत्ती करण्याची संधी असेल, जे त्यांनी मागील(2018) दौऱ्यात केले होते. मात्र स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर संघात परत आले आहेत आणि विराट कोहली तीन सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे हे भारतीय संघासाठी मोठे नुकसान असणार आहे. परंतु भारतीय संघात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये खूप क्षमता आहे ”
“भारतीय संघाकडे खुप अनुभव आहे, मात्र भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत गुलाबी चेंडूने केवळ एकच सामना खेळला आहेत. जो बांग्लादेश संघाविरुद्ध भारतीय जमिनीवर खेळला गेला होता.अशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्या देशात दिवस-रात्र कसोटी सामना भारतासाठी खुप मोठे आव्हान असणार आहे”, असेही कुंबळे पुढे म्हणाला.
कुंबळेचे म्हणणे आहे की, “भारताचे वेगवान गोलंदाज हे ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीचे आहेत. तसेच फलंदाजीच्या बाबतीत भारत ऑस्ट्रेलिया पेक्षा वरचढ आहे.” ते पुढे म्हणाले, “जर आपण गुलाबी चेंडू कसोटीत पुढे निघून जाऊ शकतो. जो की ऑस्ट्रेलियाकडे ताकद आहे. कारण जेव्हा त्याने अॅडलेड मध्ये दिवस- रात्र कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली होती. यासाठी जर भारत पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पुढे निघून जातोय तर मी भारताचे समर्थन करेन. परंतु जर असे नाही झाले तर विराट कोहली शिवाय उर्वरीत तीन कसोटी सामन्यात काम अवघड होईल.”
संबंधित बातम्या:
– कसोटी मालिकेत स्लेजिंग तर होणारच!ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचे विधान
– कोहली नव्या भारतीय संघाचा प्रतीक, कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
– ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी जिंकायची कसोटी मालिका? भारतीय दिग्गजांनी सांगितला प्लॅन