वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी दुसरे कुठून नाही तर श्रीलंकेमधून पुढे आली आहे. सध्या श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (SLvsPAK) यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या निकालानंतर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाची शर्यत आणखी रोमांचक होणार आहे.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी किंवा कसोटी चॅम्पियनशीप) २०२१-२३ या स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठे बदल होताना दिसणार आहे. यातील कोणताही वरच्या स्थानावर असणारा संघ खाली घसरणार आहे. गूरुवारी (२८ जुलै) या गुणतालिकेत बदल होणार आहेत. भारताच्या दृष्टीने पाहिले तर गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या निकालाचा फायदा भारताला होणार आहे.
श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीमध्ये पाकिस्तानसमोर जिंकण्यासाठी ५०८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्याचा निकाल भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. जर श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत केले तर भारत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर येणार आहे. तर पाकिस्तानचा संघ तिसऱ्यावरून पाचव्या स्थानावर घसरणार आहे. मात्र भारताला या स्पर्धेच्या गुणतालिकेत तेव्हाच मोठा फायदा होणार जेव्हा श्रीलंका हा सामना जिंकेल.
श्रीलंकेने हा सामना जिंकला आणि भारताने त्यांच्या खेळल्या जाणाऱ्या ६ पैकी एक सामना अनिर्णीत राखला तर भारताला अधिक नुकसान होणार नाही. मात्र पाकिस्तानने हा सामना अनिर्णीत राखला तर भारताच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हा सामना पाकिस्तानने जिंकला तर कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वाखालील असलेल्या या संघाची टक्केवारी ६३ होणार तर भारताची टक्केवारी सध्या ५२.०८ आहे. श्रीलंकेने हा सामना जिंकला तर त्यांची टक्केवारी ५३ होत ते वरच्या स्थानावर पोहोचतील. सध्या भारताचे कोणतेच कसोटी सामने सुरू नाहीत.
भारतीय संघ बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे. भारत बांगलादेश विरुद्ध बांगलादेशमध्ये २ कसोटी तर फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर ४ कसोटी सामने खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हा माजी भारतीय क्रिकेटर म्हणतोय,”सात-सात तास वनडे क्रिकेट कोण पाहणार?”
प्रेग्नेंसीनंतर ‘ही’ भारतीय महिला क्रिकेटर परतणार मैदानावर, बनणार पहिलीच क्रिकेटर
‘आयपीएलचे जागतिक स्तरावरचे वर्चस्व धोकादायक’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य