मुंबई संघ रणजी ट्रॉफी 2024 हंगामाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. उपांत्य सामन्यात मुंबईने तामिळनाडू संघाला एक डाव आणि 70 धावांनी मात दिली. तामिळनाडूने या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण हाच निर्णय त्यांना महागात पडला असे मत, त्यांचेच मुख्य प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कर्णधार साई किशोर याने घेतलेला हा निर्णय चुकीचा होता, असे कुलकर्णींना वाटते.
रणजी ट्रॉफी 2024 (Ranji Trophy) चा दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू संघात पार पडला. शनिवारी (2 मार्च) सुरू झालेला हा सामना तीन दिवसात म्हणजे सोमवारी (4 मार्च) मुंबईने नावावर केला. मुंबईच्या बीकेसी मैदानावर मुंबई रणजी संघ चांगले प्रदर्शन करताना दिसला. तुलनेने तामिळनाडूचे प्रदर्शन सुमार होते. पण तामिळनाडूच्या पराभवानंतर त्यांचे मुख्य प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी (Sulakshan Kulkarni) यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. कुलकर्णींचा असा दावा आहे की, उपांत्य सामन्या तामिळनाडू संघ पहिल्या दिवशी सकाळी 9 वाजता पराभूत झाला होता. कारण कर्णधार साई किशोर याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना सुलक्षण कुलकर्णी म्हणाले, “मी नेहमीच स्पष्ट आणि थेट बोलतो. आम्ही पहिल्या दिवशी (शनिवार) 9 वाजताच हरलो होतो. मी खेळपट्टी पाहिल्यानंतर याठिकाणी संघाला काय मिळेल, याचा मला चांगला अंदाजा आला होता. सर्वकाही ठीक होते. आम्ही नाणेफेक देखील जिंकली. एक प्रशिक्षक म्हणून, एक मुंबईकर म्हणून मी या परिस्थिती चांगल्या प्रकारे समजत होती. आम्ही प्रथम गोलंदाजी केली पाहिजे होती. पण कर्णधार वेगळाच विचार करत होता.”
दरम्यान, कुलकर्णींच्या या वक्तव्यानंतर कर्णादर साई किशोरबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सामन्याचा एंकदरीत विचार केला, तर तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना 146 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघानेही पहिल्या डावात 7 विकेट्स 100 धावांच्या आत गमावल्या होत्या. पण शार्दुल ठाकूरच्या शतकामुळे मुंबईने पहिल्या डावाच्या अंति 378 धावा केल्या. तामिळनाडू दुसऱ्यांदा फलंदाजीला येण्याआधी मुंबईकडे 232 धावांची आघाडी होती. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्याही डावात मुंबईच्या गोलंदाजांनी तामिळनाडूला 162 धावांमध्ये म्हणजे स्वस्तात गुंडाळले. परिणामी यजमान संघ एक डाव आणि 70 धावांनी विजयी झाला. (Ignorance from captain to coach, read The real reason behind Tamil Nadu’s loss in Ranji Trophy semi-final)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 : सनराईजर्स हैदराबादचा मोठा निर्णय! ‘या’ दिग्गज खेळाडूला दिली मोठी जबाबदारी
IND Vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचा संघ धर्मशाळा मध्ये दाखल, अन् हवामान पाहून बेन स्टोक्स…