---Advertisement---

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर विक्रमी विजय, दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश!

On: बुधवार, फेब्रुवारी 4, 2026 8:44 PM
---Advertisement---

भारताने अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानवर 7 विकेटने मात करत फाइनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबमधील सामन्यात भारताने 311 धावांचा पाठलाग 41.1 षटकांमध्ये करत इतिहास रचला. हा अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही संघाने केलेला सर्वात मोठा चेसिंग टार्गेट आहे.

भारताच्या सुरुवातीस वैभव सूर्यवंशी आणि एरोज जॉर्ज यांची जोरदार जोडी उभी राहिली. सूर्यवंशीने 33 चेंडूत 68 धावा केल्या, ज्यात 9 चौके आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर एरोज जॉर्जने कर्णधार आयुष म्हात्रेसोबत 114 धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी करून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. जॉर्जने 104 चेंडूत 115 धावा केल्या, ज्यात 15 चौके आणि 2 षटकारांचा समावेश आहे. अंतिम क्षणी विहान मल्होत्रा 38 धावा करत नाबाद राहिला तर वेदांत त्रिवेदीने 5 धावा जोडल्या.

अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि चार विकेट गमावून 310 धावा केल्या. ज्यामध्ये फैसल शिनोजादा (110) आणि उजैरुल्लाह नियाजई (101*) यांनी शतक ठोकले. उस्मान सादात आणि खालिद अहमदजईने पहिले विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली, तर फैसल व उस्मानने दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी उभी केली. नंतर फैसल आणि नियाजईने तिसऱ्या विकेटसाठी 148 धावांची जोरदार भागीदारी करत संघाला मजबूत स्कोअर दिला.

भारत आता अंतिम सामन्यात सहा फेब्रुवारी रोजी इंग्लंडशी भिडणार आहे. भारताची अंडर-19 टीम ही सर्वाधिक यशस्वी टीम ठरली असून पाच वेळा विजेता झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---