---Advertisement---

जसप्रीत बुमराहचा कहर, 51 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी 16 धावांत गडगडली

On: रविवार, डिसेंबर 29, 2024 10:56 AM
---Advertisement---

भारताविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या डावाच्या जोरावर पुढे होता. पण दुसऱ्या डावात दमदार गोलंदाजी करत भारताने सामन्यात स्वतःला जिवंत ठेवले. याचे संपूर्ण श्रेय जसप्रीत बुमराहला जाते. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीची अवस्था बिघडवली. खरेतर, 1973 नंतर ही पहिलीच वेळ होती. जेव्हा संघाच्या क्रमांक 4 ते 7व्या क्रमांकाच्या फलंदाजांना 20 धावाही करता आल्या नाहीत. 51 वर्षांत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाची अवस्था इतकी वाईट झाली आहे.

एमसीजी, मेलबर्न येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात टीम इंडियाने चौथ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकाच्या फलंदाजांना 16 धावांच्या आत बाद केले. याआधी, ऑस्ट्रेलियन संघाने 1973 साली मायदेशात 16 किंवा त्यापेक्षा कमी धावांसाठी हे फलंदाज गमावले होते. 51 वर्षांपूर्वी जानेवारी 1973 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध मधल्या फळीतील फलंदाजांनी 15 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली.

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 80 धावांवर तिसरा धक्का बसला. जेव्हा स्टीव्ह स्मिथला मोहम्मद सिराजने बाद केले. यानंतर जसप्रीत बुमराहचा बळी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला 85 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ॲलेक्स कॅरी केवळ 91(संघाच्या) धावांवर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. अशाप्रकारे चौथ्या क्रमांकापासून ते सातव्या क्रमांकाचे फलंदाज 16 पेक्षा कमी धावांवर बाद झाले. या दरम्यान बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण केले. सर्वात कमी सामन्यांमध्ये 200 कसोटी बळी घेणारा तो भारताचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा-

नक्की कॅप्टन आहे कोण? विराट की रोहित? पाहा व्हिडीओ काय म्हणतोय!
WTC फायनलच्या उंबरठ्यावर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान पलटवार करणार?
“जस्सी जैसा कोई नहीं..”, जसप्रीतची ‘बुम-बुम’ कामगिरी, मेलबर्न कसोटीत रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---