---Advertisement---

कर्णधार रोहितच्या जडेजाबाबतच्या ‘त्या’ निर्णयावरुन भडकले मांजरेकर, थेट आकडेवारीच मांडली

On: शुक्रवार, सप्टेंबर 27, 2024 8:15 PM
Ravindra-Jadeja-And-Rohit-Sharma
---Advertisement---

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (IND vs BAN Kanpur Test) पहिल्या दिवशी, रवींद्र जडेजाला डावखुऱ्या खेळाडूंविरुद्ध गोलंदाजी न देण्याच्या कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निर्णयावर माजी भारतीय खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी लंच दरम्यान, संजय मांजरेकर यांनी जडेजाची इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ॲलिस्टर कूक विरुद्धची आकडेवारी ट्विट केली.

मांजरेकरांच्या मते दिवसाच्या सुरुवातीलाच जडेजाने गोलंदाजी करायला हवी होती. तो एकमेव भारतीय गोलंदाज होता ज्याने पहिल्या दिवशी भारताने टाकलेल्या 35 षटकांमध्ये गोलंदाजी केली नाही. आकाश दीपने 10 षटके टाकली. तर रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 9 आणि मोहम्मद सिराजने 7 षटके गोलंदाजी केली. जडेजाने कोणतेही षटक न टाकण्याचे संभाव्य कारण मॅच-अप असू शकते. असे मानले जाते की, डाव्या हाताच्या फलंदाजांना डावखुऱ्या फिरकीपटूंचा सामना करणे सोपे जाते.

मात्र, मांजरेकर यांनी ट्विट केल्याप्रमाणे, जडेजा डाव्या हाताच्या खेळाडूंविरुद्ध संघर्ष करत नाही असे दिसत नाही. त्याने उजव्या हाताच्या फलंदाजांपेक्षा अर्ध्याहून कमी षटके डाव्या हाताच्या फलंदाजांना टाकली आहेत. 2020 नंतर तो तितका यशस्वी ठरलेला नाही.

मालिकेतील पहिल्या सामन्यात जडेजाने भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने संघ अडचणीत असताना 84 धावांची खेळी केलेली. तर, दुसऱ्या डावात तीन बळी टिपले होते.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ मुसळधार पावसामुळे लवकर संपला. खेळ थांबला तोपर्यंत बांगलादेशनं तीन गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा केल्या होत्या. बांगलादेशने उपाहारानंतरच्या सत्रात 9 षटकांच्या खेळात 33 धावा घेतल्यानंतर कर्णधार नझमुल हसन शांतोची (31) विकेट गमावली. चेन्नई येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत आघाडी घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---