भारत आणि इंग्लंड यांच्यातील विशाखापट्टणम कसोटी यजमानांच्या नावावर झाली. सोमवारी (5 फेब्रुवारी) भारतीय संघाने हा सामना 106 धावांनी जिंकला. पहिल्या डावात 6 विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराह याने दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या. त्याचसोबत रविचंद्रन अश्विन याने घेतलेल्या तीन विकेट्स देखील भारतासाठी महत्वाच्या ठरल्या. हा सामना जिंकल्यानंतर उभय संघांतील कसोटी मालिका 1-1 अशा बरोबरीला पोहोचली आहे.
इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य मिळाले होते. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या 1 बाद 67 होती. पण दुसऱ्या दिवशी दुसरे सत्र संपण्याआधी इंग्लंड संघाने पराभव स्वीकारला. सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी (5 फेब्रुवारी) इंग्लंडने 9 विकेट्स गमावल्या आणि भारताने कसोटी मालिकेतील पहिला विजय मिळवला.
INDIA DEFEATED ENGLAND BY 106 RUNS….!!!!
– India is back with a bang. 🇮🇳 pic.twitter.com/mhEtxDDFoL
— Johns. (@CricCrazyJohns) February 5, 2024
399 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेला इंग्लंड संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. सलामीवीर झॅक क्रॉली याने 73 धावांची सर्वोत्तम खेळी केली. पण संघातील दुसरा एकही फलंदाज अर्धशतकापर्यंत मजल मारू शकला नाही. इंग्लिश फलंदाज चांगल्या लयीत दिसत होते. पण भारताच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांपुढे त्यांचा निचा जास्त काळ निभाव लागत नव्हता. इंग्लंडने शेवटच्या डावात 69.2 षटके फलंदाजी केली आणि 292 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. सलामीवीर बेन डकेत याने 28 धावांवर विकेट गमावली. रेहान अहमद आणि ओली पोप यांनी प्रत्येकी 23-23 धावा करून विकेट गमावल्या. जो रुट 16, जॉनी बेअरस्टो 26, बेन स्टोक्स11, बेन फोक्स 36, टॉम हार्टली 36, तर शोएब बशी शुन्यावर बाद झाले. जेम्स अँडरसन 5 धावा करून नाबाद राहिला.
भारतासाठी या सामन्याच जसप्रीत बुमराह निर्णायक प्रदर्शन करू शकला नाही. पहिल्या डावात त्याने 6 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावातही 17.2 षटके टाकून त्याने 46 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स नावावर केल्या. रविचंद्रन अश्विन यानेही 18 षटकांमध्ये 72 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या तिघांनाही प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
या कसोटीचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात यजमान संघआने 396, तर दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. दुसरीकडे इंग्लंडने पहिल्या डावात 253, तर दुसऱ्या डावात 292 धावांपर्यंत मजल मारली.
भारतासाठी पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल याने 209 धावांची अप्रतिम खेळी साकारली. जेम्स अँडरसन शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी यांनी इंग्लंडसी पहिल्या डावात प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात शुबमन गिल याने 104 धावांची खेळी करून पुन्हा लय मिळवला. दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी टॉम हार्टली याने सर्वाधिक 4, तर रेहान अहमद याने 3 विकेट्स घेतल्या. फलंदाजांमध्ये मात्र झॅक क्रॉली व्यतिरिक्त एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. क्रॉलीने पहिल्या डावात 76, तर दुसऱ्या डावात 73 धावा कुटल्या. (IND vs ENG 2nd Test । INDIA DEFEATED ENGLAND BY 106 RUNS)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG कसोटीचा टर्निंग पॉइंट, कर्णधार रोहितचा स्लिप्समध्ये नेत्रदीपक झेल
बालपणी आर्मीत जाण्याची स्वप्ने पाहणारा भुवी आज आहे भारताचा नामवंत क्रिकेटर, वाचा त्याच्याबद्दल 10 खास गोष्टी । Bhuvneshwar Kumar Birthday