भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. यासह टीम इंडियाचा अंतिम फेरीत न पोहोचण्याचा 10 वर्षांचा दुष्काळ संपला. भारतीय संघ आता विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. मात्र, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा विजय आवडला नाही. गयाना हे भारतीय संघासाठी उत्तम मैदान आहे, त्यामुळे हा निकाल असल्याचे वॉनने सांगितले. भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू हरभजन सिंगने त्याच्या बेताल वक्तव्याबद्दल त्याला खडसावले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका वापरकर्त्याने लिहिले यावर उत्तर देताना वॉनने लिहिले, ‘जर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले असते तर त्यांना त्रिनिदादमध्ये उपांत्य फेरी खेळायला मिळाली असती आणि मला विश्वास आहे की त्यांनी तो सामना जिंकला असता… त्यामुळे त्यांची फारशी तक्रार नाही. पण गयाना हे भारतासाठी उत्तम मैदान आहे.
What makes u think Guyana was a good venue for India ? Both Teams played on the same venue . England won the toss that was an advantage . Stop being silly . England was outplayed by India in all departments. Accept the fact and Move on and keep ur rubbish with urself. Talk logic… https://t.co/2osEFYJeFC
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 27, 2024
हरभजन सिंगने वॉनच्या पोस्टवर आक्षेप घेत लिहिले, ‘तुम्हाला वाटते की गयाना ही भारतासाठी चांगली जागा होती? दोन्ही संघ एकाच मैदानावर खेळले. इंग्लंडने नाणेफेक जिंकली याचा फायदा झाला. मूर्ख बनणे थांबवा. भारताने सर्व विभागांमध्ये इंग्लंडचा पराभव केला. सत्य स्वीकारा आणि पुढे जा आणि तुमचा मूर्खपणा स्वतःकडे ठेवा. सत्य परिस्थितीवर बोला, मूर्खपणा सोडा.
इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजयापर्यंत नेले. कर्णधार रोहित शर्माने 39 चेंडूत 57 धावा केल्या, तर सूर्याने 36 चेंडूत 47 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या (23) आणि रवींद्र जडेजा (17) यांनी चमकदार कामगिरी करत भारताची धावसंख्या 171 पर्यंत नेली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा 68 धावांनी पराभव झाला. भारताचे डावखुरे फिरकी गोलंदाज अक्षर पटेल (3/23) आणि कुलदीप यादव (3/19) यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. इंग्लंडच्या फलंदाजांकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. संपूर्ण संघ 16.4 षटकांत 103 धावांत गडगडला आणि भारताने अंतिम फेरी गाठली.
महत्तवाच्या बातम्या-
भारत-दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये कोणाचं वर्चस्व? जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड
2 वर्षांपूर्वी जेव्हा भारत इंग्लंडकडून हरला, दिनेश कार्तिकने सांगितली पराभावनंतरची कटू व्यथा
रनमशीन मानधना! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्म्रीती मानधनाचं शानदार शतक