यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघानं चमकदार कामगिरी केली आहे. भारतानं 8 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सेमीफायनल 2 सामन्यात भारतानं इंग्लंडला 68 धावांनी धूळ चारुन फायनलमध्ये धडक मारली. भारत फायनलमध्ये पौहचण्यामागे कर्णधार रोहित शर्माचं मोलाचं योगदान राहिलं आहे. तत्पूर्वी माजी खेळाडू सौरव गांगुलीनं खुलासा केला आहे. की रोहित शर्मा कर्णधार होण्यासाठी इच्छुक नव्हता.
भारत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली शनिवारी (29 जून) रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 विश्वचषकाचा फायनल सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. टी20 विश्वचषकाच्या ट्राॅफीवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे.
तत्पूर्वी सौरव गांगुली म्हणाला, “रोहितनं दोन विश्वचषक फायनल खेळले आहेत. यावरुन त्याचं नेतृत्वगुण दिसून येतात. त्याच्या यशाबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. कारण मी बीसीसीआय अध्यक्ष असताना तो कर्णधार झाला होता. त्यावेळी विराट कोहली कर्णधारपद सांभाळू इच्छित नव्हता. परंतू रोहित कर्णधार होण्यासाठी तयार नव्हता. त्याला कर्णधार बनवण्यासाठी आम्हा सर्वांना खूप मेहनत घ्यावी लागली आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची प्रगती पाहून मला खूप आनंद झाला.”
पुढे बोलताना सौरव गांगुली म्हणाला, “रोहितच्या नावावर 5 आयपीएल ट्राॅफी जिंकण्याचा रेकाॅर्ड आहे. ही त्याच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आयपीएल ट्राॅफी जिंकणं कधी कधी अवघड असतं. मला चुकीचं समजू नका, मी असं म्हणत नाही की आयपीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा चांगले आहे. परंतू आयपीएल ट्राॅफी जिंकण्यासाठी तुम्हाला 16-17 (12-13) सामने जिंकावे लागतात. तेव्हा तुम्ही आयपीएलचे विजेतेपद मिळवता.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs RSA फायनल सामन्यापूर्वी जाणून घ्या कशी आहे बार्बाडोसची खेळपट्टी?
INDW vs RSAW कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतानं ठोकल्या 525 धावा
सामन्यानंतर रोहित शर्मानं दिला पत्नी रितिका सजदेहला फ्लाइंग किस, पहा व्हिडिओ