दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind test series) यांच्यात जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ सात विकेट्सने पराभूत झाला. या विजयानंतर दक्षिण अफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने या सामन्यात ९६ धावा केल्या आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिला. सामन्यात नाबाद राहुन त्याने स्वतःच्या वडिलांना दिलेला शब्द पूर्ण केला. मैदानात जाण्याआधी एल्गरने दिलेल्या शब्दाचा खुलासा त्याच्या वडिलांनी केला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात मॅच विनिंग खेळी करणाऱ्या एल्गरच्या वडिलांनी याबाबतीत खुलासा केला. माहितीनुसार, एल्गर सामन्याच्या चौथ्या दिवशी मैदानात जाण्यापूर्वी वडिलांना म्हटला होता की, तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहील आणि भारताला त्याची विकेट घेण्यासाठी त्याच्या शरीरातील एखादा भाग तोडावा लागले. ते म्हणाले, “डीनने मला सांगितले की, जर गोलंदाजांना त्याची विकेट पाहिजे असेल तर, त्यांना माझ्या शरीरातील एखादा भाग तोडावा लागेल. माझ्या शरीराला फक्त दुखापत करून ते मला बाद करू शकणार नाहीत.”
त्याच्या वहिलांनी सांगितले की, जेव्हा मी त्याच्याकडून हे ऐकले, तेव्हा मला वाटले की तो पूर्ण उत्साहित आहे आणि तो दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. एल्गरच्या वडिलांनी दुसऱ्या दिवसी सकाळी ही गोष्ट त्यांच्या पत्नीला सांगितली कीे, आज भारतीय संघ डीनला बाद करू शकणार नाही. यावर त्यांची पत्नी म्हणाली की, अजून १०० पेक्षा जास्त धावा करायच्या आहेत. त्यावर ते पुढे म्हणाले की, ” याने काहीच फरक पडत नाही. डीन आणि दुसरे फलंदाज मिळून हे लक्ष्य गाठतील. त्याला पाहून वाटत होते की, त्याचे ध्येय नक्की आहे. त्याला आजूबाजूला काय घडत आहे, याच्याशी त्याला काहीच देणेघेणे नव्हते.”
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या या दुसऱ्या कसोटी सामन्याचा विचार केला, तर यामध्ये वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारतीय संघाने पहिल्या डावात २०२, तर दुसऱ्या डावात २६६ धावा केल्या. अफ्रिकेने पहिल्या डावात २२९ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्यांना विजयासाठी २४० धावांची आवश्यकता होती. कर्णधार डीन एल्गरने दुसऱ्या डावात १८८ चेंडूत ९६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १० चौकारांचा समावेश होता. एल्गरच्या महत्वापूर्ण खेळीच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने सामना जिंकला. मालिका सध्या १-१ अशा बरोबरीवर असून पुढच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो कसोटी मालिका देखील नावावर करेल.
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण! आता तिसऱ्या कसोटीत ‘या’ खेळाडूच्या उपस्थितीवर उभे राहिले प्रश्नचिन्ह
कोरोनाची तिसरी लाट आली तरी मायदेशातील ‘ती’ मालिका होणारच! बीसीसीआयने घेतली परखड भूमिका
व्हिडिओ पाहा –