भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) दोन्ही देशांत सप्टेंबर महिन्यातच 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. याचा पहिला सामना 13 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. यादरम्यान बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा श्रेयस अय्यरकडेच (Shreyas Iyer) सोपवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, एका बाजूला वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) संघात स्थान मिळाले आहे, तर दुसऱ्या बाजूला संजू सॅमसनचे (Sanju Samson Comeback) संघात पुनरागमन झाले आहे.
दरम्यान, बीसीसीआयने निवडलेल्या संघात 4 खेळाडूंच्या नावापुढे स्टार चिन्ह देण्यात आले आहे. याचा अर्थ ते पूर्णपणे फिट (निरोगी) असतील तरच खेळू शकतील. यामध्ये नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, वॉशिंगटन सुंदर आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू काही काळापासून दुखापतग्रस्त होते. म्हणजेच, अजूनही त्यांच्या तंदुरुस्तीबाबत (Fitness) अंतिम निर्णय समोर आलेला नाही.
या मालिकेतील सर्व सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरच खेळवले जाणार आहेत, परंतु या मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (ACB) भूषवत आहे. याच मालिकेतील दुसरा सामना 15 आणि तिसरा 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. अफगाणिस्तानने आधीच आपल्या संघाची घोषणा केली आहे. लवकरच त्यांचा संघ भारतात येऊन सराव सुरू करेल.
याआधी, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून संजू सॅमसनला अचानक वगळण्यात आल्यावर बीसीसीआयवर जोरदार टीका झाली होती. पण आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. आता संघात पुन्हा एकदा तीन सलामीवीर (openers) झाले आहेत. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त संजू सॅमसनही आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमधून एका सलामीवीराला बाहेर बसावे लागेल, हे जवळपास निश्चित आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया:
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.





