येत्या १८ जुलैपासुन भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेने होणार आहे. त्यामुळे दोन्हीही संघ या मालिकेत विजय मिळवण्याचा हेतूने मैदानात उतरणार आहेत. एकीकडे युवा भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करून संघात स्थान पक्के करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. तर दुसरीकडे श्रीलंका संघाकडे २४ वर्षांपासून भारताविरुद्ध सुरू असलेल्या पराभवाच्या मालिकेवर अंकुश लावण्याची उत्तम संधी असणार आहे.
भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये १९८२ सालामध्ये द्विपक्षीय वनडे मालिकेला प्रारंभ झाला होता. तेव्हापासून हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत आहेत. २०१७ मध्ये या दोन्ही संघांमध्ये शेवटची वनडे मालिका खेळली गेली होती. आतापर्यंत या दोन संघात खेळल्या गेलेल्या १८ द्विपक्षीय वनडे मालिकांपैकी भारतीय संघाला १३ मालिकेत विजय मिळवण्यात यश आले आहे. तर श्रीलंका संघाला अवघ्या २ मालिकेत विजय मिळवता आला आहे. यापैकी ३ मालिका अनिर्णीत राहिल्या आहेत. (Ind vs Sl srilnaka team have never won an odi series against India since 1997)
श्रीलंका संघाने भारतीय संघाविरुद्ध खेळताना १९९७ मध्ये शेवटची वनडे मालिका जिंकली होती. यापूर्वी देखील १९९३ मध्ये त्यांनी भारतीय संघाचा पराभव केला होता. परंतु १९९७ नंतर श्रीलंका संघाला भारताविरुद्ध एकाही वनडे मालिकेत विजय मिळवण्यात यश आले नाही.
साल १९९७ मध्ये जेव्हा श्रीलंकेने भारताविरुद्ध वनडे मालिका विजय मिळवला होता, तेव्हा अर्जुन रणतुंगा हे श्रीलंकन संघाचे कर्णधार होते. तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल २४ वर्ष पालटली आहेत. तरीदेखील श्रीलंका संघाला भारतीय संघाविरुद्ध वनडे मालिकेत विजय मिळवण्यात यश आले नाही. श्रीलंकेने भारताविरुद्ध अखेरची वनडे मालिका जिंकल्यानंतर गेल्या २४ वर्षात या दोन संघात ११ द्विपक्षीय वनडे मालिका खेळवण्यात आल्या. त्यातील २ मालिकांचे निकाल लागले नाही. तर ९ मालिका भारताने जिंकल्या.
यंदा शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ श्रीलंका संघाला आव्हान देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. श्रीलंका संघाची गेल्या काही महिन्यांपासूनची खराब कामगिरी पाहता भारतीय संघाला या मालिकेत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण, आता भारताविरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिकेतील विजयाचा दुष्काळ श्रीलंका संघ संपवणार का की भारतीय संघ आपला विजयी रथ पुढे नेणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार की श्रेयस, टी२० विश्वचषकासाठी भारत चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवणार? दिग्गजाने दिले उत्तर
विक्रमवीर अश्विन! पहिल्याच काउंटी सामन्यात केला विक्रम, गेल्या ११ वर्षांत कोणालाही नाही जमला
एका टी२०त ४ रनआऊट, भारतीय महिलांचे लाजबाव क्षेत्ररक्षण; पण खरे श्रेय द्रविडच्या खास व्यक्तीला