---Advertisement---

‘सर्व ठिक, पण…’, कर्णधार रोहित शर्मा झाला पत्नी रितिकाकडूनच ट्रोल

On: बुधवार, फेब्रुवारी 23, 2022 2:05 PM
Rohit-Ritika-Sharma
---Advertisement---

वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशातील टी-२० आणि कसोटी मालिका खेळायची आहे (India vs Sri Lanka t20 series). टी-२० मालिकेची सुरुवात २४ फेब्रुवारीपासून होणार आहे. पहिला सामना लखनऊमध्ये खळला जाणार असून भारतीय संघाने सरावाला सुरुवातही केली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) याने एक सोशल मीडिया पोस्ट केली. या पोस्टवर त्याची पत्नी रितिका सजदेह (ritika sajdeh) हिने त्याला ट्रोल केले आहे.

टी-२० मालिकेपूर्वी मंगळवारी (२२ फेब्रुवारी) भारतीय संघाचे सराव सत्र पार पडले. सराव सत्रात रोहित शर्मा, ईशान किशन, जसप्रीत बुमराह यांच्यासह इतरही खेळाडूंनी घाम गाळला. रोहितने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून सराव सत्रातील फोटो शेअर केले. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये कर्णधाराने लिहिले की, “आता श्रीलंकेची वेळ आहे.”

रोहितच्या या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण त्याची पत्ती रितिकाने केलेल्या एका कमेंटची खास चर्चा होत आहे. रितिकाने कमेंटमध्ये लिहिले की, “हो-हो, हे सगळं छान आहे, पण तू मला परत फोन करू शकतो का?” चाहते या दोघांमधील जुगलबंदीचा आनंद घेत आहेत.

https://www.instagram.com/p/CaSIkUloXEv/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या या आगामी टी-२० मालिकेतून भारताचा वेगावन गोलंदाज दीपक चाहर आणि चांगल्या फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव या दोघांनी माघार घेतली आहे. बीसीसीआयने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात चाहरच्या मांसपेशींमध्ये ताण आल्यामुळे तो मैदानातून बाहेर गेला होता. त्याची हीच दुखापत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे आणि या मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादवला हेयरलाइन फ्रॅक्चर असल्याचे उघड झाले आहे.

Rohit Insta
Photo Courtesy: Instagram/@rohitsharma

त्याव्यतिरिक्त संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेतून संघात पुनरागमन करणार आहेत. केएल राहुल सध्या विश्रांतीवर असल्यामुळे ईशान किशन आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करतील अशी शक्यता आहे. तसेच दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या दोघांनाही विश्रांती दिली गेली आहे. भारतीय संघाचे आगामी काळातील व्यस्त वेळापत्रक पाहता खेळाडूंना एकापाठोपाठ विश्रांती दिली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

बिग ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हे’ दोन प्रमुख खेळाडू टी२० मालिकेतून बाहेर, बीसीसीआयने दिली माहिती

T20 WC 2022: युएई ८ वर्षांनी खेळणार टी२० विश्वचषकात, आयर्लंडही स्पर्धेसाठी पात्र

श्रीरामचे देशप्रेम! ऑस्ट्रेलियन संघासह पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास श्रीधरन श्रीरामचा नकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---