---Advertisement---

बंगळुरू कसोटीत ‘सामनावीर’ बनलेल्या श्रेयसने सांगितली मनातली गोष्ट, झोपेतही पाहायचा टेस्टचे स्वप्न

Shreyas Iyer
---Advertisement---

भारत आणि श्रीलंकेतील (IND vs SL) २ सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) सोमवारी (१४ मार्च) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (Bengaluru Test) समाप्त झाली. भारतीय संघाने या कसोटी मालिकेत श्रीलंकेला २-० ने पराभवाचा धक्का दिला. बंगळुरूतील दिवस-रात्र कसोटी २३८ धावांच्या फरकाने जिंकत भारताने या मालिकेवर कब्जा केला आहे. हा भारतीय संघाचा मायदेशातील सलग १५ वा सामना विजय आहे.

या संपूर्ण मालिकेदरम्यान भारताच्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने त्याच्या बॅटने शानदार प्रदर्शन करत सर्वांची मने जिंकली आहेत. त्याच्या बंगळुरू कसोटीतील धमाकेदार प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर (Player Of The Match) ही निवडले गेले. यानंतर त्याने आपल्या या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या मालिकेदरम्यान श्रेयस अय्यरने २ सामन्यांमध्ये ६२ च्या सरासरीने फलंदाजी करताना १८६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ९२ धावा राहिली आहे. ही धुव्वादार खेळी त्याने बंगळुरू कसोटी सामन्यातच केली होती. याच सामन्यातील दुसऱ्या डावातही त्याने ६७ धावांचे योगदान दिले होते. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर निवडले गेले.

सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया (Shreyas Iyer On MOM) देताना श्रेयस म्हणाला की, ती माझी खेळण्याची सामान्य पद्धत नव्हती. परंतु जेव्हा मी इतर फलंदाजांना फलंदाजी करताना पाहिले, तेव्हा मला वाटले की, आपणही आक्रमक खेळायला पाहिजे. मी त्यावेळी फक्त गोलंदाजांच्या एक पाऊल पुढे राहण्याच्या प्रयत्न करत होतो. जेव्हा खालच्या क्रमातील फलंदाज यायला सुरू झाले, तेव्हा माझ्या धावा ५५ इतक्याच होत्या. त्यानंतर मात्र मी ३७ धावा जोडल्या होत्या. यावेळी मी शतकापासून हुकेल की नाही, याचा विचार करत नव्हतो.  

कसोटी क्रिकेट खेळण्याचे होते स्वप्न
श्रेयसने २०१७ मध्येच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्याला कसोटीत पदार्पण करण्यासाठी २०२१ पर्यंत वाट पाहावी लागली. आपले हे स्वप्न साकार झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना श्रेयस म्हणाला की, आम्हाला एक लक्ष्य दिले गेले होते आणि मला जास्तीत जास्त चेंडू खेळायचे होते. मी नेहमीच भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले होते, जेणेकरून मी महान खेळाडूंसोबत खेळू शकलो असतो आणि उच्च स्तरावर माझे सर्वश्रेष्ठ देऊ शकलो असतो. अपेक्षा करतो की, येणाऱ्या दिवसांमध्येही मी माझे सातत्य टिकवून ठेवू शकेल. 

महत्त्वाच्या बातम्या-

टिक टिक बुम! रोहित आणि बुमराह पोहोचले मुंबईत, ‘पलटण’ने शेअर केला झक्कास व्हिडिओ

सुपर ओव्हरमध्येही फायनलचा निकाल न लागल्यास ‘असा’ ठरणार विजेता, आयपीएल २०२२चे नवे नियम वाचलेत का?

श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर श्रेयस आणि अश्विनचा जुना व्हिडिओ जोरदार व्हायरल, कसोटीत केलाय मोठा विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---