भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील टी-२० मालिकेचा शेवटचा सामना रविवारी खेळला गेला. या सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले, पण युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याचे खास कौतुक केले जात आहे. फलंदाजीवेळी अय्यरने एक असा शॉट खेळला, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील या शेवटच्या सामन्यात वेंकटेश एका वेगळ्याच अंदाजात दिसला. त्याने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली आणि संघाला अपेक्षित धावसंख्येपर्यंत घेऊन गेला. वेस्ट इंडीजविरुद्धची ही मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळली गेली. वेंकटेश आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळतो, त्यामुळे हे मैदान त्याच्यासाठी घरच्यासारखे होते.
याठिकाणी शेवटच्या सामन्यात त्याने १९ चेंडूत ३५ धावा केल्या. यामध्ये त्याच्या चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. फलंदाजी करताना त्याने एक ३६० डिग्री स्टाइलमध्ये एक षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना वेंकटेशचा हा शॉच चांगलाच आवडल्याचे दिसत आहे.
https://twitter.com/Komban_Tweets/status/1495414680449261568?s=20&t=ytiuOnZ1rGg_XMFo4paVwQ
व्हिडिओ पाहाण्यासाठी इथे क्लिक करा
वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर भारताने पहिल्या १४ षटकात अवघ्या ९३ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर वेंकटेश अय्यर आणि सूर्यकुमार यादव या जोडीने शेवटच्या ४ षटकात तब्बल ८६ धावा साकारल्या आणि संघाची धावसंख्या १८४ पर्यंत घेऊन गेले. सुर्यकुमार आणि वेंकटेश यांच्यात ९१ धावांची भागिदारी झाली. भारताच्या विजयात सूर्यकुमारने ३१ चेंडूत ६५ धावा करून महत्वाचे योगदान दिले. यामध्ये त्याच्या १ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.
तत्पूर्वी, सामन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. भारताने ५ विकेट्सच्या नुकसानावर १८४ धावा केल्या आणि विरोधी संघाला विजयासाठी १८५ धावांचे लक्ष्य दिले. वेस्ट इंडीज संघ प्रत्युत्तरात २० षटकांमध्ये १६७ धावांपर्यंत पोहचू शकला आणि भारताने १७ धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या हा तिसरा टी-२० सामना जिंकण्यापूर्वी भारताने आधीचे दोन टी-२० सामने देखील जिंकले होते. अशा प्रकारे टी-२० मालिकेत वेस्ट इंडीजला भारताकडून क्लीन स्वीप (३-०) मिळाला. टी-२० मालिकेपूर्वी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत देखील वेस्ट इंडीजला एकही सामना जिंकता आला नव्हता. एकदिवसीय मालिकेत देखील भारताने ३-० असा विजय मिळवला होता.
महत्वाच्या बातम्या –
रोहित ठरला विराट-धोनीला भारी; भारतात केली कोणालाही न जमलेली कामगिरी
वृद्धीमान सहाला धमकावणाऱ्या पत्रकाराची आता खैर नाही, बीसीसीआय करू शकते कारवाई
भारताविरुद्धच्या पराभवाचे पोलार्डने सांगितले कारण, म्हणाला, ‘आम्ही भारताच्या डावाच्या…’