कोलकता। भारत विरुद्ध बांगलादेश संघात इडन गार्डनवर पार पडलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने एक डाव 46 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने एक मोठा विश्वविक्रम रचला आहे.
भारताने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावाने मिळवलेला हा सलग चौथा विजय होता. त्यामुळे सलग चार कसोटी सामने एका डावाने जिंकणारा भारत जगातील पहिलाच संघ ठरला आहे.
India become the first team to register four consecutive Test wins by an innings margin. ???? pic.twitter.com/RPOflnIDMV
— ICC (@ICC) November 24, 2019
भारताने या सामन्याआधी इंदोरला झालेला बांगलादेश विरुद्धचा पहिला कसोटी सामनाही एका डावाने जिंकला होता. तसेच त्याआधी भारताने ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुण्यात आणि रांचीला झालेले कसोटी सामनेही एका डावाने जिंकले होते.
यामुळे विराट कोहलीही सलग चार कसोटी सामने एका डावाने जिंकणारा पहिलाच कर्णधारही ठरला आहे.
भारताच्या शेवटचे 4 कसोटी सामने –
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पुणे – एक डाव 137 धावांनी विजय
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रांची – एक डाव 202 धावांनी विजय
विरुद्ध बांगलादेश, इंदोर – एक डाव 130 धावांनी विजय
विरुद्ध बांगलादेश, कोतकाता – एक डाव 46 धावांनी विजय
ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत भारताचा एका डावाने दणदणीत विजय
वाचा????https://t.co/taL15ksxDN????#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest— Maha Sports (@Maha_Sports) November 24, 2019
टीम इंडियाच्या मुंबईत होणाऱ्या या सामन्यात मोठा फेरबदल, आता या शहरात होणार सामना https://t.co/gn26WPrBLF#म #मराठी #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia
— Maha Sports (@Maha_Sports) November 24, 2019






