ब्रिस्टल | भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या टी२० सामन्यात कुलदीप यादवच्या जागी दिपक चहर या खेळाडाला संधी देण्यात आली आहे. कुलदीपला या सामन्यात का संधी देण्यात आली नाही याचे कारण मात्र पुढे आले नाही. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
याबद्दल माजी कर्णधार सौरव गांगुलीने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. “कुलदीपला युझवेंद्र चहलच्या आधीही संधी द्यायला हवी होती. कारण तो एक फाॅर्ममध्ये असलेला खेळाडू आहे.” असे मत गांगुलीने व्यक्त केले.
Here's the Playing XI for #TeamIndia. Kaul and Chahar come in in place of Kuldeep and Kumar pic.twitter.com/aBAJ3yucyF
— BCCI (@BCCI) July 8, 2018
तिसऱ्या टी२० साठी टीम इंडिया- रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), सुरेश रैना, एमएस धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिपक चहर, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, युझवेद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या:
-Video: कोण आहे तो दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू; जो गातो हिंदी कव्वाली!
-रोहित शर्माला मागील तीन सामन्यात हुलकावणी देणारा विक्रम आज करण्याची संधी
-हार्दिक पंड्याने एमएस धोनीला दिली ही खास भेट






