भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात सध्या टी20 मालिकेचा थरार सुरू आहे. दोन्ही संघांनी मागील सामन्यांमध्ये रोमांचक विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतात झालेल्या टी20 सामन्यांची आकडेवारी पाहिली, तर श्रीलंकेला केवळ तीनदा सामने जिंकता आले आहेत. श्रीलंकेने पहिला सामना 2009मध्ये जिंकला होता, त्यानंतर त्यांना तिसरा सामना जिंकण्यासाठी 2023ची वाट पाहावी लागली. यामधील नंतरच्या दोन्ही विजयाचे नाते पुण्याशी आहे, ते कसे हे आपण जाणून घेऊ.
2009 पासून ते आतापर्यंत श्रीलंकेने भारताविरुद्ध भारतात एकूण 16 टी20 सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामन्यात भारत हरला असून एका सामन्याचा निकाल लागला नाही. 2009मध्ये नागपूर येथे झालेल्या सामन्यात श्रीलंका 29 धावांनी जिंकला होता. त्यानंतर भारतात भारताविरुद्ध दुसरा टी20 सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला जवळपास 8 वर्षे लागली. 2016चा सामना पुण्यात खेळला गेला होता. त्या सामन्यात भारत एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली खेळला होता. त्यामध्ये भारत 101 धावांवरच गारद झाला होता. तो सामना भारताने 5 विकेट्सने गमावला होता.
आता भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेविरुद्ध पुण्यात टी20 सामना गमावला आहे. हा सामना भारताने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली 16 धावांनी गमावला. यामुळे भारताने पुण्याच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन टी20 सामने खेळले. त्यातील केवळ एकच सामना भारताने जिंकला होता. तो सामना भारताने 2020मध्ये विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली खेळला होता. त्यामध्ये भारताने 201 धावसंख्या उभारली होती. तो सामना भारताने 78 धावांनी जिंकला होता.
विशेष म्हणजे या तिन्ही सामन्यात श्रीलंकेचा आताचा कर्णधार दसुन शनाका खेळला. 2016ला झालेल्या सामन्यात त्याने 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तो 2020च्या सामन्यातही श्रीलंकेच्या अंतिम अकराचा भाग होता. तसेच नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने कर्णधारपदाला साजेशी अशी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली. त्याने गुरुवारी (5 जानेवारी) झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाबाद 56 धावा केल्या.
भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा आणि मालिका निर्णायक सामना 7 जानेवारीला राजकोट येथे खेळला जाणार आहे. (India lost three out of two t20 match in Pune vs Sri Lanka)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: 1983 विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास 10 गोष्टी
भारताच्या पराभवावर हेड कोच राहुल द्रविडची प्रतिक्रिया! म्हणाले, ‘युवा खेळाडूंकडून चुका…’