बर्मिंघम, इंग्लंड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समधून (Commonwealth Games)भारताला बुधवारी (३ ऑगस्ट) आनंदाची बातमी मिळाली आहे. अ गटात असणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने साखळी फेरीत कॅनडाचा ३-२ असा पराभव केला आहे. या विजयाबरोबरच भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या सामन्यात भारताकडून सलिमा टेटे, नवनीत कौर आणि लालरेम्सियामी यांनी गोल केले आहेत.
भारतीय हॉकीची या स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी चांगली राहिली आहे. भारत या स्पर्धेत चार सामने खेळला आहे. त्यातील तीन सामने जिंकले असून इंग्लंड विरुद्ध पराभव झाला होता. तर भारताने घानाला ५-० आणि वेल्सला ३-१ असे पराभूत केले होते.
भारत १९९८च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये चौथ्या स्थानावर राहीला होता. तर भारत आतापर्यंत पाचव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताचा ५ ऑगस्टला उपांत्यफेरीचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
भारताची कॉमनवेल्थ गेम्समधील कामगिरी
भारतीय महिला हॉकी संघाने १९९८मध्ये पहिल्यांदा कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळताना संघ चौथ्या स्थानावर राहिला होता. तसेच २००२मध्ये मॅनचेस्टर येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली होती. तर २००६मध्ये रौप्य पदक जिंकले होते. तसेच २०१० आणि २०१४मध्ये भारत पाचव्या स्थानावर राहिला. २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र तेथे कांस्य पदक थोडक्यात हुकले होते.
कॅनडा विरुद्ध भारताचे प्रदर्शन
वंदना कटारियाने पुन्हा एकदा उत्तम सुरूवात करत पहिल्या मिनिटालाच शॉट मारला, मात्र विरोधी संघाच्या गोलकिपरने तो रोखला. त्यानंतर भारताला तिसऱ्या मिनिटाला पेन्लटी कॉर्नर मिळाली. या संधीचा फायदा घेत सलीमा टेटेने गोल करत संघाला १-० अशी चांगली सुरूवात करून दिली.
दुसऱ्या सत्रातही भारताचे वर्चस्व दिसले. नवनीत कौरने २२व्या मिनिटाला गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र कॅनडाच्या ब्रिएन स्टेयर्सने गोल करत सामना २-१ अशा केला.
Full Time! #WomenInBlue triumph over Canada in today's match at the Birmingham 2022 Commonwealth Games, proving that victory and India go well together.
CAN 2:3 IND#IndiaKaGame #HockeyIndia #B2022 #Birmingham2022 @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/dItuOXXSxy
— Hockey India (@TheHockeyIndia) August 3, 2022
कॅनडाने तिसऱ्या सत्रात अजून एक गोल करत सामना बरोबरीत केला. चौथ्या सत्रात वंदनाने ४७व्या मिनिटाला गोल केला, हा पण शॉट रोखण्यात विरोधी गोलकिपरला यश आले. तर ४९व्या भारताने केलेला गोल रद्द करण्यात आला. भारतीय संघाने सामन्यांच्या या शेवटच्या सत्रात आक्रमक भुमिका घेतली. त्याचा फायदा भारताला ५१व्या मिनिटात झाला. यावेळी लालरेम्सियामीने तिसरा आणि सामना विजयी गोल केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादवची नवीन स्पोर्ट्स कार, वेस्ट इंडीजची धुलाई केल्यानंतर दिले स्वतःलाच गिफ्ट
थेट हृदयावर वार! झंझावाती अर्धशतकानंतर सूर्यकुमारची मन जिंकणारी कृती, Video व्हायरल
दुखापतग्रस्त असूनही रोहितने गाजवले मैदान! चाहते म्हणाले, ‘कॅप्टन असावा तर असा’