येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. भारतीय संघ हा सामना जिंकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण भारतीय संघ एक मजबूत संघ म्हणून दिसून येत आहे.
तसेच न्यूझीलंड संघातील फलंदाज आणि गोलंदाज देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. हा सामना विराट कोहलीसाठी देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. कारण अद्याप विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकही आयसीसी चषक आपल्या नावावर करण्यात यश आले नाही.
इंग्लंडच्या खेळपट्टीचा खासियत म्हणजे ती वेगवान गोलंदाजांना नेहमीच मदत करते. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये देखील अशीच खेळपट्टी असते. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाने परदेशातही जाऊन विजय मिळवला आहे. २०१६ पासून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांची इंग्लंडमधील कामगिरी पहिली तर, भारतीय संघ खूप पुढे आहे. जानेवारी महिन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत जाऊन हरवले होते. त्यांनी कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. तसेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा हा पहिलाच अंतिम सामना आहे. त्यामुळे विराट कोहली देखील हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
भारतीय संघ हिट तर न्यूझीलंड संघ फ्लॉप
भारतीय संघाने १ जानेवारी २०१६ पासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये १३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांना ५ सामने जिंकण्यात यश मिळाले आहे. तर ६ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाने ३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांना तिनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आपल्या नावावर करण्याची नामी संधी असणार आहे.
भारतीय संघ पुढेच
भारतीय संघाने १ जानेवारी २०१६ पासून एकूण ५५ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांना ३६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले तर १२ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच ८ सामने ड्रॉ राहिले होते. तर न्यूझीलंड संघाची कामगिरी पहिली तर, त्यांनी ४० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांना २२ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले, तर १२ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच ६ सामने हे ड्रॉ राहिले आहेत. यामध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ५ वेळेस आमने सामने आले आहेत. यात भारतीय संघाने ३ तर न्यूझीलंड संघाला २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चहलचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह; गोलंदाज भावुक होत म्हणाला, ‘आपल्या लोकांना जवळ ठेवाव’
लढाई कोरोनाविरुद्धची! गरजवंतांच्या मदतीसाठी धावला शिखर धवन, ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनीही मानले आभार