भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ जून ते २२ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्हीही संघ मैदानात कसून घाम गाळताना दिसून येत आहेत. एकीकडे भारतीय संघ सराव करण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाला पराभूत करायचे असेल तर भारतीय संघाला ठोस रणनिती आखावी लागणार आहे.
द रोज बाउल स्टेडियमची खेळपट्टी, न्यूझीलंडचे खेळाडूंविरुद्ध प्रभावी ठरु शकणारे खेळाडू, भारतीय संघातील खेळाडूंचा फॉर्म अशाच बऱ्याच गोष्टींचा विचार करुन भारतीय संघ निवडला जाईल. अशात अनेकांना प्रश्न पडला असेल की, या मोठ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली कोणत्या खेळाडूंना अंतिम एकादशमध्ये स्थान देईल? चला तर पाहूया कशी असू शकते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन.
गोलंदाज
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी सुरू असलेल्या इंट्रास्क्वॅड सराव सामन्यात, दिग्गज गोलंदाज ईशांत शर्मा हा चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्याला या सराव सामन्यात तीन गडी बाद करण्यात यश आले आहे. अनुभवाच्या बळावर ईशांत शर्मा या संघात स्थान मिळवू शकतो. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे भारतीय संघाचे प्रमुख गोलंदाज ठरू शकतात.
याव्यतिरिक्त मोहम्मद सिराज देखील या संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघ या सामन्यात तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. त्यामुळे चौथा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू असू शकतो. यासाठीही भारतीय संघाकडे आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन पर्याय आहेत. दोघांपैकी जडेजाला संघात स्थान देण्यात येऊ शकते.
या गोलंदाजांना मिळू शकते संधी : ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा
मध्यक्रमातील फलंदाज
भारतीय संघाच्या मध्यक्रमाचा भार संपूर्णतः विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्या खांद्यावर असणार आहे. पुजाराला इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. तसेच हनुमा विहारीने देखील नुकतीच काऊंटी स्पर्धा खेळली आहे. त्यामुळे हे तिघेही भारतीय संघाच्या मध्यक्रमात मोलाचे योगदान देऊ शकतात. यासोबतच अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. मुख्य म्हणजे हनुमा विहारी ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करू शकतो.
या फलंदाजांवर मधल्या फळीचा भार : विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी
अंतिम सामन्यात सलामी फलंदाज कोण?
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा सलामी फलंदाजी करणार यात काही शंका नाही. परंतु त्याच्यासोबत डावाची सुरुवात कोण करणार याबाबत अजूनपर्यंत कुठलाही खुलासा केला गेला नाहीये. या स्थानासाठी केएल राहुल आणि मयंक अगरवाल हे दोघेही प्रबळ दावेदार आहेत. परंतु इंट्रास्काॅड सराव सामन्यात शुबमन गिलने ८५ धावांची खेळी केली आहे. त्यामुळे शुबमन गिल विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो.
सलामी फलंदाज : रोहित शर्मा, शुबमन गिल
अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, ईशांत शर्मा, जसप्रीत बमुराह, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
WTC Final: भारताविरुद्धच्या लढतीसाठी न्यूझीलंडचा अंतिम संघ जाहीर, पाहा कोण इन कोण आऊट
मुंबईत जन्मलेला ‘हा’ फिरकीपटू भारतीयांची उडवणार दाणादाण, न्यूझीलंडच्या अंतिम संघात मिळाली जागा