भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा दावा करत टीम इंडिया लवकरच आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय संघ विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
भारतीय संघाने शेवटचे 2013 मध्ये आयसीसीचे विजेतेपद पटकावले होते. गेल्या 10 वर्षांपासून भारतीय संघ विविध स्पर्धांमध्ये आयसीसी विजेतेपदाच्या जवळ आला होता, परंतु ट्रॉफी जिंकण्यापासून चुकला. बीसीसीआय पुरस्कारादरम्यान जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर शास्त्री ( Ravi Shastri) म्हणाले की, आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ लवकरच संपणार आहे.
रवी शास्त्री म्हणाले की, “सध्याच्या भारतीय संघाला पाहून मला आनंद होत आहे, जो मैदानात उतरतो, मेहनत घेतो आणि क्षणाचा आनंद घेतो. विश्वचषक 2023 दरम्यान ज्या प्रकारचे क्रिकेट खेळले गेला हे पाहून खूप मजा आली. कॉमेंट्री करतानाही बरं वाटलं.”
रवी शास्त्री म्हणाले, “30-40 वर्षे खेळाचा एक भाग राहिल्यानंतर मी शिकलो की, तुम्ही खेळता तेव्हा त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यावा. हे 9 ते 6 तासाचा जॉब असू शकत नाही जेथे तुम्हाला असे वाटते की संपूर्ण जगाचे वजन तुमच्या खांद्यावर आहे. उन्हात खेळावे लागते. तुम्ही खेळ खेळता. ती बटणे उघडा आणि मैदानावर जा आणि आपल्या वेळेचा आनंद घ्या.”
ते पुढे म्हणाले, “तुम्ही स्वत:ला व्यक्त करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आणि मला आनंद आहे की, ही टीम ते करत आहे. दुर्दैवाने ते विश्वचषक जिंकू शकले नाहीत, पण फारूकने म्हटल्याप्रमाणे त्यांनी खेळलेला क्रिकेटचा ब्रँड अप्रतिम होता. त्याला बघायला मजा आली. काॅमेंट्री करताना मजा आली. भारतीय संघ आयसीसीचे जेतेपद पटकावण्याची वेळ लवकरच येईल.”
भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता. (Indian team’s ICC title drought will end soon predicts Ravi Shastri)
हेही वाचा
रोहन बोपन्नाने रचला इतिहास; ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत मारली धडक, जागतिक क्रमवारीत बनला नंबर-1
IND vs ENG: इंग्लंड संघाला मोठा धक्का, पाकिस्तानी वंशाचा बशीर मोठ्या कारणामुळे पहिल्या कसोटीतून बाहेर