क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) देखील भारत आणि पाकिस्तान भिडले होते. त्यावेळी भारतानं पाकिस्तानला धूळ चारली होती. भारतीय क्रिकेट संघ (27 जुलैपासून) श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून, त्याआधी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. यावेळी महिला आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे.
यंदाच्या महिला आशिया चषकाला (19 जुलैपासून) सुरुवात होत आहे. त्याचे यजमानपद श्रीलंकेकडे आहे. यूएई आणि नेपाळ या स्पर्धेतील सलामीच्या लढतीत आहेत. तर हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ आशिया चषक स्पर्धेत उतरणार आहे. ज्याची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यानं होणार आहे. हा सामना 19 जुलै रोजी रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होणार आहे.
महिला आशिया चषकासाठी दोन्ही संघ
भारत- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मानधना (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन
पाकिस्तान- निदा दार (कर्णधार), इरम जावेद, सादिया इक्बाल, आलिया रियाझ, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोज, मुनिबा अली, सिद्रा अमीन, नाझिहा अल्वी, सय्यदा अरुब शाह, नशरा सुंधू, तस्मिया रुबाब, ओमेमा सोहेल, तुबा हसन
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर, 2012 ते 2022 यादरम्यान भारत आणि पाकिस्तान टी20 आशिया चषकामध्ये 6 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारतानं 5 सामन्यात बाजी मारली आहे. तर पाकिस्तान संघ 2022 मध्ये फक्त भारताला पराभूत करु शकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘नाही तर करिअर संपेल…’, या कारणासाठी जेव्हा सेहवागने सौरव गांगुलीसमोर ठेवली मोठी अट
धक्कादायक! प्रसिद्ध क्रिकेटरच्या घरावर दोन वेळा हल्ला, शेवटी सोडावे लागले घर
भविष्यात कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर त्याची जागा कोण घेणार? ‘या’ खेळाडूंमध्ये आहे धमक