भारतीय महिला क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा आणि ट्रेनर नरेश रामदास यांच्या जागेवर आता नवीन लोकांची नियुक्ती केली जाणार आहे. दोघांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी बायो-बबलमध्ये प्रवेश केला नाही. इंग्लंड दौऱ्यावर अभयच्या कामाची खेळाडूंनी प्रशंसा केली होती. तो राष्टीय क्रिकेट अकादमीच्या सहायक कर्मचाऱ्यांमध्ये सहभागी आहे. त्याने मंगळवारी संध्याकाळी भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला नाही, यामुळे खेळाडूंनाही आश्चर्य वाटले. भारतीचे माजी सलामीवीर फलंदाज शिवसुंदर दास फलंदाजी प्रशिक्षकाच्या जागेवर कार्यरत आहेत. संघाचे मुख्य कोच रमेश पोवार असून ते गोलंदाजी प्रशिक्षकाचे कामही पार पाडतात.
अभय शर्माने खेळाडूंसोबत खूप काम केले आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेदरम्यान टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौरने त्याच्या कामाचे कौतुक केले होते. दरम्यानच्या काळात संघाच्या क्षेत्ररक्षणातही अनेक सुधार पाहायला मिळाले होते. हरलीन देओलने सीमारेषेवर घेतलेला झेल सर्वांना लक्षात आहे. भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजनेही क्षेत्ररक्षणातील सुधारणेसाठी शर्माचे कौतुक केले होते.






