आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पंचांच्या पॅनेलमध्ये स्थान मिळविणारी पहिली महिला भारताची जीएस लक्ष्मी ही रविवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात होणाऱ्या महिला विश्वचषक २०२२ (Womens World cup 2022) च्या अंतिम सामन्यात सामनाधिकारी म्हणून दिसणार आहे.
तिने पुरुषांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सामनाधिकारीची भूमिका बजावली आहे. अशी कामगिरी करणारी लक्ष्मी ही पहिली महिला पंच आहे. डिसेंबर २०२० मध्ये युएई मध्ये झालेल्या विश्वचषक लीग २ दरम्यान तिने पंचाची भूमिका बजावली होती.
हॅगले ओव्हल येथे महिला विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये पार पडणार आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच ४ महिला सामना अधिकारी किंवा पंचांची भूमिका बजावताना दिसणार आहेत. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे आणि इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
आता दक्षिण आफ्रिकेच्या लॉरेन एगेनबर्ग आणि न्यूझीलंडच्या किम कॉटन या अंतिम सामन्यासाठी मैदानावरील पंच असतील, तर वेस्ट इंडिजच्या जॅकलिन विल्यम्स टीव्ही पंच म्हणून काम पाहतील.
एमसीजी येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील २०२० च्या महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये कॉटन या एकमेव महिला पंच होत्या. या दरम्यान त्यांनी अहसान रझासोबत मैदानी पंचाची भूमिका बजावली होती. जॅकलीन यांनी २०२० मध्ये पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या पंचाची भूमिका निभावली होती, अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिली महिला ठरल्या होत्या. त्यांनी ही भूमिका वेस्ट इंडिज आणि आयर्लंडच्या ३ सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत बजावली होती.
झिम्बाब्वेचा लेंगटान रुसारे हा चौथे पंच म्हणून दिसणार आहेत. आयसीसीने या महिला पंचांबद्दल म्हटले आहे की, “खेळातील लिंग समानतेसाठी आमच्या रणनिती वचनबद्धतेनुसार आयसीसी आंतरराष्ट्रीय महिलांच्या सामना अधिकार्यांची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि या स्पर्धेतील १५ पैकी ८ सामनाअधिकारी महिला असणार आहेत”.
जीएस लक्ष्मी २००८-२००९ पासून सामनाधिकारी म्हणून काम करत आहेत. तिने आतापर्यंत महिलांसाठी १८ एकदिवसीय आणि २५ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सामनाधिकारी म्हणून भूमिका बजावली आहे. याशिवाय तिने पुरुष क्रिकेटच्या ५ एकदिवसीय आणि १६ टी२० सामन्यांमध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तिचा जन्म १९६८ मध्ये आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे झाला. मात्र तिचे शिक्षण जमशेदपूर येथे झाले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीने ज्या बॅटने षटकार मारत विश्वचषक जिंकला तिला मिळाली भलतीच किंमत
IPL 2022| पुण्यात रंगणार गुजरात वि. दिल्ली लढतीचा थरार! सामन्याबद्दल सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल मुंबई वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही