रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा आयसीसी टूर्नामेंट मध्ये यंदाच्या टी20 विश्वचषक फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सुमारे 7 महिन्यांपूर्वी देखील, टीम इंडिया आयसीसी स्पर्धेच्या (2023 एकदिवसीय विश्वचषक) अंतिम फेरीत पोहोचली होती, जिथे त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आयसीसी फायनलमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब आहे.
आयसीसी टूर्नामेंटच्या फायनलमध्ये टीम इंडियाला आतापर्यंत अनेक पराभवांचा सामना करावा लागला आहे. संघाने आतापर्यंत एकूण 12 आयसीसी स्पर्धेचे अंतिम सामने खेळले आहेत. आता भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलद्वारे 13 वी आयसीसी फायनल खेळेल. तर त्याआधी जाणून घेऊया गेल्या 12 आयसीसी फायनलमधील संघाचा विक्रम.
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 फायनलपैकी भारतीय संघ फक्त 4 सामने जिंकू शकला आहे. फायनलमध्ये संघाचे केवळ चार विजय हा चाहत्यांसाठी चिंतेचा विषय आहे. टीम इंडियाने शेवटची आयसीसी फायनल 11 वर्षांपूर्वी 2013 मध्ये जिंकली होती. तेव्हापासून टीम इंडियाने पाच आयसीसी फायनल गमावल्या आहेत.
सर्व आयसीसी 12 फायनलमध्ये भारताचा विक्रम
1983 चा विश्वचषक जिंकला
2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत हरले
2002 चॅम्पियन्स ट्रॉफी टाय
2003 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हरले
2007 चा टी20 विश्वचषक जिंकला
2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला
2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
2014 च्या टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये हरलो
2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत हरलो
2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हरलो
2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हरलो
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हरलो.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून बदला घेत टीम इंडियाने टी20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भारताचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाला सुपर-8 मध्ये पराभूत करून स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर 2022 च्या शेवटच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाने उपांत्य फेरीतच इंग्लंडला पराभूत करून स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
महत्तवाच्या बातमया-
क्रिकेट विश्वात खळबळ! फायनलपूर्वी टीम इंडियाचा धक्कादायक निर्णय
रोहित शर्मा उंचावणार टी20 विश्वचषकाची ट्राॅफी, शोएब अख्तरनं केलं मोठं वक्तव्य!
कर्णधार बनण्यासाठी रोहित शर्मा इच्छुक नव्हता! सौरव गांगुलीनं केला मोठा खुलासा