भारतीय क्रिकेट संघाने मंगळावारी (२३ मार्च) इंग्लंड विरुद्ध वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यासाठीच्या भारतीय संघाच्या निवडीवर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
फिरकीपटू युजवेंद्र चहल टी२० मालिकेदरम्यान खास कामगिरी करू शकला नसल्याने त्याला पहिल्या वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. याबद्दल सेहवाग म्हणाला की, जेव्हा संघात गोलंदाज आणि फलंदाजांच्या निवडीचा विचार केला जातो तेव्हा त्यांच्यात भेदभाव केला जातो. सेहवागने यासाठी केएल राहुलचे उदाहरण दिले.
सध्याच्या भारतीय संघामध्ये गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना जास्त संधी मिळत आहेत असा आरोप सेहवाग यांनी संघ व्यवस्थापनावर केला. त्यांना असे वाटत आहे की, खराब फॉर्म असूनही फलंदाजांना अधिक संधी मिळतात, तर गोलंदाजांना लवकरच संघामधून वगळण्यात येत आहे.
पाचव्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात केएल राहुलला अंतिम ११ जणांच्या भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते, पण पुन्हा त्याची तो पहिल्या वनडे सामन्यात परतला. दुसरीकडे तिसर्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर संघातून वगळलेल्या युजवेंद्र चहलला वनडे सामन्यासाठी स्थान मिळालेले नाही.
सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला की, ‘तूम्ही एका सामन्यानंतर गोलंदाजांना संघाबाहेर करता, पण केएल राहुलला चार सामने देता आणि मग पाचव्या सामन्यात त्याला बाहेर करता. जर आपण गोलंदाजांना बर्याच संधी दिल्या असतील तर एक-दोन सामने त्यांच्यासाठी वाईट देखील असू शकतात. जर जसप्रीत बुमराहच्या बाबतीत असे घडले असते तर तुम्ही त्याच्याबरोबर असे केले असते का? नाही, कारण तुम्ही म्हणाला असता की, तो चांगला गोलंदाज आहे व तो पुन्हा चांगला खेळ करेल. पण युजवेंद्र चहल हा सुध्दा तुमचा टी२० स्पेशालिस्ट गोलंदाज आहे, त्याने सुद्धा तुम्हाला बळी मिळवून दिले आहेत. जर त्याचे २-३ सामने खराब गेले तर तुम्ही त्याला संघाबाहेर का ठेवले, ‘असा प्रश्न सेहवागने विचारले.
चहल हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट प्रकारात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने ४८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ६२ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीचा ‘हा’ खेळाडू अडकणार विवाह बंधनात, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता
विराटच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय मांजरेकरांनी साधला निशाणा, म्हणाले….