---Advertisement---

INDvsENG 1st ODI: धवनचे शतक हुकले, पदार्पणवीर कृणाल पंड्याचे वादळी अर्धशतक; इंग्लंडला विजयासाठी ३१८ धावांची गरज

---Advertisement---

पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात मंगळवारपासून (२३ मार्च) ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे झाला. या सामन्यात भारताचा सलामीलीर शिखर धवन, विराट कोहली, कृणाल पंड्या आणि केएल राहुल यांनी अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे भारताने इंग्लंडला पहिल्या सामन्यात ३१८ धावांचे आव्हान दिले आहे.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात केली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित २८ धावा करुन बाद झाला. पण यानंतर कर्णधार विराट कोहलीने शिखरला चांगली साथ दिली.

विराट आणि शिखर यांच्यात शतकी भागीदारी झाली. ही भागीदारी रंगत असतानाच विराट ५६ धावा करुन मार्क वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल मोईन अलीने घेतला. त्यामुळे शिखर आणि विराटमधील १०५ धावांची भागीदारी तुटली. विराट पाठोपाठ काही वेळात श्रेयस अय्यर देखील ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर काहीवेळातच शिखरही ९८ धावा करुन बाद झाला. त्याचे शतक केवळ २ धावांनी हुकले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले.

शिखरनंतर हार्दिक पंड्यानेही केवळ १ धावेवर विकेट गमावली. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि कृणाल पंड्याने नाबाद अर्धशतके झळकावत भारताला ३०० धावांच्या पार नेले. कृणालने या सामन्यातून पदार्पण केले आहे. पदार्पणातच त्याने २६ चेंडूत अर्धशतक झळकावले.

भारताच्या डावातील ५० षटके संपली तेव्हा केएल राहुल ४३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६२ धावांवर आणि कृणाल पंड्या ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे भारताने ५० षटकात ५ बाद ३१७ धावा केल्या आणि इंग्लंडला ३१८ धावांचे आव्हान दिले.

महत्त्वाच्या बातम्या –

पदार्पणाची कॅप स्वीकारताना भावूक झालेल्या कृणाल पंड्यासाठी वसीम जाफरचा खास संदेश, म्हणाला…

INDvENG: शिखर धवनचा ‘तो’ फटका इतका खतरनाक होता की चेंडूच बदलावा लागला

अभिमानास्पद! १७ वर्षीय शेफाली वर्मा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---