रविवारी(११ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये २७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. हा सामना अबू धाबीमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल.
हा सामना जिंकून प्ले-ऑफच्या दिशेने एक पाऊल टाकण्यास दिल्ली सज्ज असेल. त्याचवेळी दिल्लीला नमवून गुणतालिकेत शीर्षस्थानी जाण्याची संधी मुंबईकडे असेल. सध्या ६ सामन्यांपैकी ५ सामने जिंकून दिल्ली गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर मुंबई ६ सामन्यांपैकी ४ सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या सामन्यात दिल्ली आणि मुंबईच्या काही खेळाडूंना खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघांमध्ये रंगणाऱ्या सामन्यात होऊ शकतात हे विक्रम –
-रोहित शर्माने या सामन्यात ६१ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये ४००० धावा पूर्ण करेल.
-ट्रेंट बोल्टने या सामन्यात २ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो आयपीएलमध्ये ५० विकेट्सचा टप्पा पार करेल.
-हार्दिक पंड्याने जर या सामन्यात २ किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेतले तर तो आयपीएलमध्ये ५० झेल पूर्ण करेल.
– कागिसो रबाडा आणि हर्षल पटेलला आयपीएलमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी ४ विकेट्सची गरज आहे.
– शिखर धवन आणि रिषभ पंतला आयपीएलमध्ये १०० षटकार पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी १ षटकाराची गरज आहे.
– शिखर धवनला दिल्ली फ्रँचायझीसाठी आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी ७ धावांची आवश्यकता आहे.
-रिषभ पंतने या सामन्यात ८८ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये २००० धावांचा टप्पा पार करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“मीच आहे युनिव्हर्सल बॉस…”, हॉस्पिटलमध्ये चिल करत असलेल्या गेलने केले वक्तव्य
“माझी तुलना तीही रोहित शर्माशी…”, युवा पाकिस्तानी क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य
‘निशब्द’ झाला पंजाब संघ; कोलकाता विरुद्धच्या पराभवानंतरचे ‘हे’ ट्विट होतंय व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’