---Advertisement---

चहल म्हणतोय, ‘मला आरसीबीमधून निवृत्त व्हायचंय आणि माझं स्वप्न असेल की…’

chahal rcb
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. आयपीएल स्पर्धेनंतर यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषकाचे आयोजन केले गेले आहे. भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला विश्वचषकाच्या संघात निवडले गेले नाही. याच पार्श्वभूमीवर चहल आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चांगले प्रदर्शन करून दाखवण्याचा प्रयत्न करेल.

भारताच्या श्रीलंका दौऱ्यात तो चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि आगामी आयपीएलमध्येही त्याचा हा फॉर्म कायम राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तो जोपर्यंत आयपीएलमध्ये खेळत आहे तोपर्यंत आरसीबीसाठीच खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

तो याविषयी बोलताना म्हणाला, “मी आरसीबीमधूनच निवृत्ती घेऊ इच्छित आहे आणि माझे नेहमी हे स्वप्नं असेल की, मी जेव्हा कधी आयपीएलमध्ये खेळेल तेव्हा आरसीबीसाठीच खेळेल.”

ग्लेन मॅक्सवेलने पहिल्या टप्प्यात चांगले प्रदर्शन केले असून चहलने याचे श्रेय कर्णधार विराट कोहलीलाही दिले आहे की, मॅक्सवेलला कर्णधाराच्या अपेक्षा माहित होत्या. तो म्हणाला की, “मला वाटते कोणत्याही खेळाडूच्या खेळायच्या पद्धतीत कर्णधाराचे खूप महत्त्व आहे. मॅक्सवेलला माहित आहे की, आपल्या संघाचा कर्णधार हा भारतीय संघाचा कर्णधार देखील आहे, ज्याला ढीली वृत्ती आवडत नाही. त्याला तेव्हाच चांगले वाटते, जेव्हा तुम्ही मैदानात तुमचे १०० टक्के देतात, मग तुम्ही काहीही करा. मॅक्सवेलला माहित होते की, तो अन्य आयपीएल फ्रॅंचाईजीमध्ये जी ढिलाई दाखवतो, ती येथे चालणार नाही.”

मॅक्सवेल आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मॅक्सवेलच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. मात्र, मॅक्सवेलने आरसीबीसाठी आयपीएलच्या २०२१ च्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक २२३ धावा करून त्याचे उत्तर दिले आहे.

चहलला भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यामध्ये शेवटच्या दोन टी२० सामन्यांमधून माघार घ्यावी लागली, कारण त्याला कोरोनाची लागण झाली होती. दौऱ्यात त्याने याआधी दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये पाच विकेट घेतले होते आणि दौऱ्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

हनुमा विहारीने सोडली आंध्र प्रदेशची साथ, आगामी हंगामात करणार ‘या’ संघाचे प्रतिनिधित्व

‘भारतासाठी दोन वेगवेगळे कर्णधार असणे फायद्याचेच’, माजी भारतीय क्रिकेटरने मांडले मत

मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईला टेंशन, डू प्लेसिसनंतर आता ‘या’ खेळाडूच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---