मागील काही दिवसांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने संघाच्या सीईओंबाबत एक वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता की, संघाचे सीईओ प्लेइंग इलेव्हन निवडण्यात हस्तक्षेप करतात. त्यामुळे चांगलीच चर्चा रंगली होती. आता यावर श्रेयस अय्यर याने स्पष्टीकरण दिले आहे. कोलकाताने आयपीएल २०२२च्या ६१व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला ५४ धावांनी पराभूत करत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. या विजयासोबतच त्यांनी आपला नेट रनरेटही चांगला केला. विजयानंतर कर्णधाराने आनंद व्यक्त करत आपल्या संघाच्या नियोजनाबाबत आणि सीईओंबाबत स्पष्टीकरण दिले.
सीईओंबाबत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
नुकतेच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) म्हणाला होता की, त्याच्यासाठी संघाची निवड करण्यात अडचणी येतात. तसेच, अनेकदा संघाचे सीईओ वेंकी म्हैसूर (Venky Mysore) हेदेखील संघ निवडण्यात हस्तक्षेप करत असतात. यावर आता स्पष्टीकरण देत अय्यर म्हणाला की, “आमच्याकडे आता गमावण्यासारखे काही उरले नाही. आम्ही आतापर्यंत लीगमध्ये आमचा चांगला खेळ दाखवला नाही आणि आज सामना सुरू होण्यापूर्वी मी याबद्दल चर्चा केली होती. याशिवाय मी मागच्या मुलाखतीत जे काही बोललो होतो, त्यावरही मला माझे स्पष्टीकरण द्यायचे आहे. संघ निवडीत सीईओच्या समावेशाबाबत माझे म्हणणे असे होते की, ज्या खेळाडूंना संघात स्थान मिळत नाही, त्यांना सीईओ सांभाळतात. जेव्हा आपण संघ निवडतो, तेव्हा ते आपल्यासाठी खूप कठीण असते.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
सामना जिंकल्यानंतर बोलताना श्रेयस म्हणाला की, “नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे होते. कारण, पुण्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी अधिक सामने जिंकले आहेत आणि आमच्यासाठी सर्व काही सुरळीत पार पडले. आम्ही प्रत्येक षटक खेळत होतो आणि आंद्रे रसेल याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याची आमची योजना होती. आम्हाला माहित होते की, वॉशिंग्टनला एक षटक बाकी आहे आणि आम्हाला ते षटक लक्ष्य करायचे होते. सॅमही चांगल्या पद्धतीने साथ देत होता. आमच्यासाठी सर्व काही चांगले झाले आणि आम्हाला आशा आहे की, अंतिम सामन्यातही सर्वकाही चांगले होईल.”
या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले. त्यांनी १३ सामने खेळताना त्यातील ६ सामने जिंकले, तर उर्वरित ७ सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. आता ते प्लेऑफमध्ये पोहोचतात की, नाही हे पाहावे लागेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आंद्रे रसेलचा हैदराबादविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, कोलकाताने ५४ धावांनी जिंकली रोमांचक लढत
मंकीगेट प्रकरणामुळे भारतीयांच्या डोक्यात गेला होता एँड्र्यू सायमंड्स, नक्की काय होतं ते प्रकरण?