सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आयपीएल २०२२ हंगामात चांगलाच चर्चेत आला आहे. उमरान मलिकचा वेगवान चेंडू फक्त भारतातच नाही विदेशात देखील चर्चेचा विषय बनला आहे. चालू आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान चेंडू देखील त्यानेच टाकला आहे. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेदने देखील आता त्याचे कौतुक केले आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाने अनेक दिग्गज वेगवान गोलंदाज दिले आहेत. परंतु अलीकडच्या काळात उत्कृष्ट फलंदाजांसाठी ओळखला जाणाऱ्या भारतीय संघात देखील काही उत्कृष्ट वेगवान गोलंदाज दिसत आहेत. उमरान मलिक (Umran Malik) देखील भारताचा भविष्यातील महत्वाचा खेळाडू बनेल, असे अनेकांना वाटते. याच पार्श्वभूमीवर जेव्हा पाकिस्तानचे माजी दिग्गज आकिब जावेद (Aaqib Javed) यांना प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी खास प्रतिक्रिया दिली. जावेदच्या मते भारतीय क्रिकेटची रचना आणि आयपीएलमुळे असे गोलंदाज भारतीय संघाला मिळू लागले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जावेद म्हणाले की, “भारताची रणजी ट्रॉफी आणि क्रिकेट मजबूत आहे. ते मुलभूत गोष्टींवर ठाम राहतात. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये असे आहे की, संघ त्यांच्या आवडत्या खेळाडूंना निवडू शकतो. ते पैसे देऊन कोणालाही विकत घेऊ शकतात आणि कोणाला उत्तर देखील द्यायचे नसते. आता खेळाडूंना असे वाटत नाही की, त्यांनी आधी क्लबसाठी खेळावे, नंतर जिल्ह्यासाठी, त्यानंतर डिविजनसाठी आणि यानंतर त्यांची निवड होईल. आता खेळाडू बुट उचलतात आणि संघाच्या कॅम्पमध्ये जाऊन वेगवान गोलंदाज बनतात.”
जावेदच्या मते खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळणाऱ्या अफाट पैशामुळे त्यांच्यापुढे अनेक मार्ग खुले झाले आहेत. जावेद म्हणाले की, “आयपीएलमुळे प्रत्येक खेळाडूसाठी अधिक मार्ग खुले होत आहेत. चार षटके गोलंदाजी केल्यावर तुम्हाला करोडो रुपये मिळत आहेत. त्यामुळेच लोकं या खेळाकडे अधिक आकर्षित होत आहेत.”
दरम्यान, उमरान मलिकने आयपीएल २०२२ मध्ये अतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले आहे. हंगामातील सुरुवातीच्या ९ सामन्यांमध्ये १५ विकेट्स त्याने घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकने १५४ किमी पेक्षा जास्त ताशी गतीने एक चेंडू टाकला, जो हंगामातील सर्वात गतीमान चेंडू ठरला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ची ‘फ्लॉप इलेव्हन’, रोहितकडे उपकर्णधारपद; पाहा कोण बनलंय कर्णधार
ब्रेकिंग! प्लेऑफमधून बाहेर झालेल्या मुंबईच्या ताफ्यात मोठा बदल, ‘हा’ धाकड यष्टीरक्षक संघात सामील
अर्जुन तेंडुलकर कधी करणार आयपीएल पदार्पण? मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनी दिले ‘हे’ उत्त