आयपीएल (IPL tournament) स्पर्धेला यावेळी नवीन चॅम्पियन मिळणार आहे, कारण आयपीएलच्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers bangaluru) आणि पंजाब किंग्स (punjab kings) या दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. या दोन्ही संघांनी आजपर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी (IPL trophy) जिंकलेली नाही.
अशा परिस्थितीत पहिल्यांदा कोणत्याही एका संघाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. क्वालिफायर एक मध्ये या दोघा दोन्ही संघांची घडत झाली होती तेव्हा rcb ने विजय मिळवत फायनल सांगण्यात स्थान पक्के केले. तसेच पंजाब किंग्स ने क्वालिफायर दोन मध्ये मुंबईचा पराभव करत फायनल सामन्याचे तिकीट मिळवली तसेच आरसीबी सोबत होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरणे सर्व खेळाडूंना खास संदेश दिला आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघावर विजय मिळवल्यानंतर आरसीबी सोबत (3 जून) रोजी होणाऱ्या फायनल पूर्वी पंजाबचा कर्णधार श्रेयसने (Shreyas iyer) म्हटले आहे, मी सध्या त्याच गोष्टींमध्ये आहे. मी या गोष्टीला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ड्रेसिंग रूममध्ये जाऊन माझ्या संघासोबत आम्ही फायनलमध्ये पोहोचल्याचा आनंद साजरा करायचा आहे. आम्ही फायनलमध्ये पोहोचलो आहोत. पण मला व्यक्तिगत स्वरूपाने वाटते की, काम अजून अपूर्ण आहे. यामुळे फायनलबद्दल मी जास्त विचार करणार नाही, सध्या वर्तमान क्षणाचा विचार करत आहे. तो खेळाडूंना म्हणाला, उत्साहाने जागे व्हा, आराम करा आणि चांगल्या मानसिकतेने खेळासाठी तयार राहा.
प्लेयर ऑफ द मॅच (Player of the match) अवॉर्ड मिळाल्यानंतर श्रेयस म्हणाला, मला अशा मोठ्या संधी खूप आवडतात. मी नेहमीच स्वतःला आणि संघाच्या खेळाडूंना म्हणत असतो, जितकी मोठी संधी असेल तुम्ही त्या परिस्थितीत तेवढेच शांत रहा. तुम्हाला मोठे निर्णय मिळतील आणि आज एक मोठं उदाहरण राहिलं, जिथे घाम गाळल्याशिवाय स्वतःच्या श्वासांवर मी अधिक लक्ष केंद्रित करत होतो.
जसा मी खेळण्याआधी उल्लेख केला होता, सर्व खेळाडूंनी पहिल्या चेंडूपासूनच उत्साह दाखवण्याची गरज आहे. पण सुरुवातीला तेवढा फायदा घेऊ शकलो नाही. नंतर मला काही वेळ घ्यावा लागला, दुसऱ्या फलंदाजांनी देखील चांगली फलंदाजी केली.
या सामन्यात श्रेयसने शानदार कर्णधार पद भूषवत चांगली फलंदाजी देखील केली. आरसीबी विरुद्ध क्वालिफायर 1 मध्ये तो धावा करू शकला नाही. पण मुंबई विरुद्ध त्याने वेगळ्या अंदाजात 41 चेंडूत नाबाद 87 धावांची पारी खेळली. या दरम्यान त्याने 5 चौकार आणि 8 षटकार झळकावले. आता चाहत्यांना अंतिम सामन्यात देखील त्याच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल.






