हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या सुरुवातीलाच इंग्लंड संघाने भारतीय संघाला बॅकफूटवर टाकले आहे. या सामन्यात जेम्स अँडरसनने सुरुवातीलाच भारतीय फलंदाजांना बाद करून भारताला मोठे धक्के दिले होते. त्याने पहिल्या डावात विराट कोहलीलाही बाद करत नॅथन लायनची बरोबरी केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील वैर काही नवीन नाही. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील लढत कोहली विरुद्ध अँडरसन अशी देखील पाहायला मिळते. परंतु, या मालिकेत अँडरसनने विराट कोहलीला बॅकफूटवर टाकून ठेवले आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीलाच अँडरसनने विराट कोहलीला ७ धावा करत माघारी धाडले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक वेळेस बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नॅथन लायनची बरोबरी केली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही सामन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. जेम्स अँडरसनने विराटला आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ७ वेळेस बाद केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने देखील विराट कोहलीला ७ वेळेस बाद करून माघारी धाडले आहे.
तसेच स्टुअर्ट ब्रॉड, मोईन अली, पॅट कमिन्स आणि बेन स्टोक्स यांनी विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत प्रत्येकी ५ वेळेस बाद केले आहे. (James Anderson equals the record of Nathan Lyon to dismiss Virat Kohli in most times in test cricket)
हेडिंग्ले कसोटीत जेम्स अँडरसनची अप्रतिम गोलंदाजी
भारतीय संघाने हेडिंग्ले कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. जेम्स अँडरसनने सुरवातीला केएल राहुलला ० धावांवर माघारी धाडले होते. त्यानंतर चेतेश्वर पुजारालाही अवघी १ धाव करत माघारी धाडले होते. तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीला ही त्याने जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. विराटला त्याने अवघ्या ७ धावा करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
यानंतरही क्रेग ओव्हरटन, सॅम करन आणि ऑली रॉबिन्सन यांनी भारताच्या खेळाडूंना फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. त्यामुळे भारताचा पहिला डाव केवळ ७८ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक १९ धावा केल्या, तर रहाणेने १८ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियावर २१ व्या शतकात दुसऱ्यांदा ओढवली ‘ही’ नामुष्की; नकोशा विक्रमाच्या यादीत पाकिस्तान अव्वल
वेट प्लेट्सवर बॅलन्स करत श्रेयस अय्यरचे अनोखे पुशअप्स, रणवीर सिंगही व्हिडिओ पाहून चकित
असे तीन खेळाडू जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मिळवून देऊ शकतात पहिली आयपीएल ट्रॉफी