भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मोलाहीच्या मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी (First Test) सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसते आहे. या सामन्याच्या दिवसाचा खेळ (०५ मार्च) संपला असून भारताच्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ४ बाद १०८ धावा अशा स्थितीत आहे. अर्थात पाहुणा संघ अजून यजमानांपेक्षा ४६६ धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना भारतीय गोलंदाजांनी बरेचसे नो बॉल टाकले. अगदी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यानेदेखील नो बॉल टाकले.
परंतु बुमराहचा एक नो बॉल (Jasprit Bumrah’ No Ball) भारतीय संघाला महागात पडला. कारण त्याच्या चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज स्वस्तात त्रिफळाचीत झाला होता. परंतु तो चेंडू नो बॉल निघाल्यामुळे त्या फलंदाजाला जीवनदान मिळाले व तो दुसऱ्या दिवसाखेर नाबादही राहिला.
नक्की कसे मिळाले श्रीलंकेच्या फलंदाजाला जीवनदान
तर झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने रविंद्र जडेजा (१७५ धावा) आणि रिषभ पंत (९६ धावा)च्या खेळींच्या जोरावर ५७४ धावांवर डाव घोषित केला. भारताच्या भल्यामेठ्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला ४८ धावांवरच पहिला झटका बसला. त्यांनी सलामीवीर लहिरू थिरिमानेच्या रूपात पहिली विकेट गमावली. थिरिमाने १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर पथुम निसांका (Pathum Nissanka) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
परंतु डावातील ३२ वे षटक टाकायला आलेल्या बुमराहने त्याला गुडघे टेकायला भाग पाडले होते. त्याच्या या षटकातील तिसरा चेंडू निसांकाला काही कळायच्या आतच सरळ यष्टीला जाऊन धडकला होता. श्रीलंकेचा अजून एक फलंदाज स्वस्तात बाद झाल्याचे पाहून भारतीय संघाच्या ताफ्यात आनंदाची लहर परसली होती. भारतीय खेळाडूंनी तर विकेटचा जल्लोषही साजरा करायला सुरुवात केली होती.
https://twitter.com/im_maqbool/status/1500063023037579264?s=20&t=L_EzqP2mKfLYkS9L6_lmaQ
तितक्यात मैदानावर सायरनचा आवाज ऐकू आला. मैदानी पंच या चेंडूला व्यवस्थित पाहू शकले नव्हते. परंतु तिसऱ्या पंचांनी बारकाईने चेंडू पाहिला होता आणि त्यांनी हा नो बॉल असल्याचा निर्णय दिला. यानंतर बुमराहसहित भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्याचा रंग उडालेला दिसला. तिसऱ्या पंचांचा निर्णय पाहिल्यानंतर अगदी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid Reaction) यांचीही प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. ते हा नो बॉल असल्याचे पाहून सुन्न झाले होते. त्यांचेही तोंड पडले होते.
दुसरीकडे जीवनदान मिळालेला पथुम निसांका (Pathum Nissanka Not Out) दुसऱ्या दिवसाखेर नाबाद राहिला. तो नाबाद २६ धावांवर खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अय्योव! विराट शतक करेपर्यंत कट्टर चाहत्याने लग्न न करण्याची घेतली शप्पत, फोटो तुफान व्हायरल
एक-दोन नव्हे पाचव्यांदा रिषभ पंतचे हुकले कसोटी शतक; म्हणाला, ‘कधी कधी मला असे वाटते…’
इमाम-उल-हकनंतर आता अझहर अलीनेही ठोकलं शतक; ऑस्ट्रेलिया संघ दबावात