---Advertisement---

“क्रिकेटपासून जरा लक्ष दुसरीकडे वळवा, तरच…”, कर्णधार जो रूटचा संघ सहकार्‍यांना सल्ला

---Advertisement---

सध्या इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत पाहुण्या संघाने पहिली कसोटी जिंकून शानदार सुरुवात केली होती. मात्र त्यांनतर पुढील दोन कसोटी सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली. विशेषतः अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अवघ्या दोन दिवसात इंग्लंडला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

या सगळ्या परिस्थितीमुळे इंग्लंडचा संघ चांगलाच दबावाखाली सापडला आहे. विशेषतः कर्णधार जो रूट वगळता त्यांच्या कुठल्याही खेळाडूला या मालिकेत खास छाप सोडता आली नाहिये. त्यामुळे उद्यापासून म्हणजेच ४ मार्चपासून सुरु होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ चिंतेत असल्याचे समजते आहे. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने संघावर दबाव असल्याच्या मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला.

“क्रिकेटपासून ब्रेक घ्या”

इंग्लंडच्या संघावर चौथ्या कसोटीत पुनरागमन करण्यासाठी अतिरिक्त दबाव वाढतो आहे. यावर बोलतांना रूट म्हणाला, “एकूणच संघनिवड आणि आमचे प्रदर्शन याबाबत सध्या बरीच चर्चा सुरु आहे. पण आम्ही खेळाडूंना यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच संघ व्यवस्थापन म्हणून आमच्यासाठी सगळ्या खेळाडूंना सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.”

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कर्णधार जो रूटने संघातील खेळाडूंना क्रिकेटपासून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते. तिसऱ्या कसोटीतील दारूण पराभवापासून सावरण्यासाठी रूटने हा मार्ग निवडला असल्याचे म्हंटले जात आहे. याशिवाय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या पॉल कॉलिंगवूडच्या आजारपणाचाही खेळाडूंवर परिणाम झाला आहे. मात्र त्यातून सावरत कॉलिंगवूड पुन्हा एकदा सराव सत्रात परतल्याने इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममधील स्थिती काहीशी सुधारली देखील आहे.

चौथ्या सामन्यात पुनरागमन करण्याचे लक्ष्य

भारताविरुद्धच्या चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जोमाने तयारी करत असल्याचेही यावेळी जो रूटने सांगितले. तो म्हणाला, “तिसरी कसोटी दोन दिवसातच संपल्याने आम्हाला चौथ्या सामन्याआधी काहीसा अधिक वेळ मिळाला. या वेळेचा उपयोग आम्ही आमच्या फायद्यासाठी करून घेतला असून आमच्या चुकांवर मंथन करण्यासाठी आम्हाला हा वेळ उपयुक्त ठरला. गेल्या काही दिवसात आमच्यात उत्तम संवाद घडला असून चौथ्या कसोटीत पुनरागमन करण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही जर शेवटचा सामना जिंकून २-२ अशी बरोबरी करू शकलो तर आमच्यासाठी ती शानदार उपलब्धी असेल.”

महत्वाच्या बातम्या:

इंस्टाग्रामवर १०० मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्याने भारावला कोहली, अनोख्या अंदाजात मानले चाहत्यांचे आभार

ऐकावं ते नवलंच!! सामनावीर पुरस्कार म्हणून क्रिकेटरला दिला चक्क ५ लिटर पेट्रोलचा कॅन

आयपीएलमध्ये खेळापेक्षा पैशांची जास्त चर्चा होते म्हणणाऱ्या स्टेनला मागावी लागली माफी, म्हणाला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---