भारताचा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्माने २००७ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात टाकलेल्या महत्त्वपूर्ण शेवटच्या षटकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता त्याने एका वेगळ्या कारणामुळे सर्वांचे मन जिंकले आहे.
२००७ ला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात गोलंदाजी करत असताना जोगिंदरने (Joginder Sharma) पाकिस्तानचा फलंदाज मिस्बाह उल हकला (Misbah Ul Haq) झेलबाद केले होते. त्याचा झेल भारताचा गोलंदाज एस श्रीसंतने (S. Sreesanth) पकडला होता. जोगिंदरने घेतलेल्या या महत्त्वाच्या विकेटने भारताला पहिला टी२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
आता हा माजी गोलंदाज कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर पोलिसाची जबाबदारी पार पाडत असल्याने चर्चेत आहे. तो हरियाणामध्ये डीएसपी (DSP) पदावर कार्यरत आहे आणि या महामारीपासून लोकांचे संरक्षण करण्याचे काम तो करत आहे.
जोगिंदरने क्रिकइंफोशी बोलताना तो दिवसभरातील २४ तास कसे काम करत असतो, याविषयी सांगितले आहे. तसेच, तो आपात्कालीन परिस्थितींसाठी नेहमी तयार असतो. तो सध्या लोकांनी लॉकडाऊनचे (Lockdown) पूर्णपणे पालन करावे याची दक्षता घेत आहे, असेही पुढे तो म्हणाला.
“माझा दिवस सकाळी ६ वाजता सुरु होतो आणि रात्री ८ वाजता मी घरी परत जात होतो. कायद्यानुसार तर मी २४ तास सेवा करण्यासाठी तयार असतो. मला यासाठी नकार देता नाही,” असे तो यावेळी म्हणाला.
जोगिंदर आता हिसारच्या ग्रामीण भागात काम करत आहे. तिथे त्याला चेक पोस्टवरती काम करावे लागत आहे. तिथे केवळ ट्रक आणि बस ड्राइव्हर्सला समझवावे लागत नाही तर, सामान्य लोकांनादेखील या व्हायरसविषयी त्याला माहिती द्यावी लागते.
क्रिकइन्फोशी बोलताना जोगिंदरने खुलासा केला आहे की, त्याने या महामारीमुळे घरी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिसारपासून त्याचे घर अवघ्या ११० किमी अंतरावर आहे. पण, तरीही त्याच्या संपर्कात येऊन त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला त्याला अडचणीत आणायचे नाही, म्हणून त्याने घरी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी बोलताना तो म्हणाला की, “मी सध्या रोहतकमध्ये राहत आहे, जे हिसारपासून ११०किमी दूर आहे. तिथे जाण्यासाठी मला दीड तासांचा कालावधी लागतो. तरीही मी घरापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-घरच्यांना त्रास द्यायचा म्हणून या क्रिकेटरला लहानपणी ठेवयाचे झोपाळ्याला बांधून