---Advertisement---

‘आज जे काही आहे, ते फक्त मुंबई इंडियन्समुळेच,’ केकेआरच्या क्रिकेटपटूचे मन जिंकणारे वक्तव्य

---Advertisement---

यंदाच्या 2021 च्या आयपीएल मोसमातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या चुरशीच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करीता उतरलेल्या मुंबई संघाने सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद 152 धावा केल्या. तर केकेआरकडून गोलंदाजी करताना आंद्रे रसेलने दोन षटकांत 15 धावा देऊन 5 बळी घेतले.

दुसऱ्या डावात फलंदाजी करीता आलेल्या केकेआर संघाच्या नितीश राणा आणि शुभमन गिलच्या मजबूत सलामी नंतरही 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात फक्त 142 धावा केल्या. त्यामुळे केकेआरला मुंबई इंडियन्सकडून 10 धावांनी पराभव पत्करावा लागला.

या सामन्यापूर्वी केकेआर कडून खेळणारा ऑफस्पिनर गोलंदाज हरभजन सिंगने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना मोठे विधान केले. आज मी जो काही आहे ते सर्व मुंबई इंडियन्समुळे असल्याचे त्याने सांगितले.

तो म्हणाला की, “धन्यवाद मुंबई इंडियन्स, गेली 10 वर्षे मी इंडियन्सकडून खेळलो आहे. त्यामुळे आज मी जो काही आहे तो मुंबई इंडियन्समुळे आहे. सध्या मला इतर संघ खेळण्याची संधी देत ​​असतील; तर ते सर्व मुंबई इंडियन्समुळेच झाले आहे.”

मागील युएईमध्ये झालेल्या आयपीएल मोसमात हरभजन खेळला नव्हता. त्यामुळे या पर्वानंतर चेन्नई सुपर किंग्सने त्याला संघातून रिलीज केले होते. पण यंदाच्या आयपीएल लिलावात केकेआरने त्याला विकत घेतले. आत्तापर्यंत हरभजनने 162 सामन्यात 150 बळी घेतले आहेत. या टी-20 लीगमध्ये 150 पेक्षा जास्त बळी मिळविण्यात फक्त पाच गोलंदाजांना यश आले असून यामध्ये हरभजनचेही नाव आहे. यामध्ये त्याची सरासरी 27 असून स्ट्राइक रेट 23 च्या आसपास आहे. तर इकोनॉमी 7 च्या जवळपास आहे. दरम्यान एका सामन्यात त्याने पाच बळी घेतले आहेत, तर एका सामन्यात त्याने चार बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अरे बाबा चेंडू बघून तरी थांबायचं! पाकिस्तानी खेळाडूने ‘असा’ सोडला सोपा झेल, Video पाहून व्हाल लोटपोट

‘मुंबई इंडियन्सची बॅटिंग चालू आहे, मुद्द्याचचं बोला,’ मुख्यमंत्र्यांचे लाईव्ह चालू असताना चाहत्याची विनोदी प्रतिक्रिया

चिवट लढतीनंतर कडवा शेवट, केकेआरच्या लाजिरवाण्या पराभवाची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---