---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्याआधी केएल राहुल भावुक, रोहित-विराटबाबत केलं मोठं वक्तव्य!

---Advertisement---

भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात 20 जून पासून होणार आहे. टीम इंडिया मोठ्या काळानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय कसोटी क्रिकेट खेळणार आहे. मोठ्या काळापासून हे दोन्ही दिग्गज टीम इंडियासाठी खेळत आलेले आहेत. या दोन्ही खेळाडूंमध्ये कोणतरी एक नेहमीच संघात उपलब्ध असायचं. हेडिंग्ले कसोटी सामन्याआधी के एल राहुलने भावुक होऊन या दोन्ही दिग्गजांच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया खूप कमजोर दिसत आहे. दोन्ही खेळाडू संघात नसल्याने युवा खेळाडूंवर दबाव येईल. याविषयी बोलताना राहुल म्हणाला, विराट आणि रोहित मागच्या एका दशकापासून भारतीय क्रिकेटचे स्तंभ आहेत आणि त्याचं संघात नसणं खूप कमी भासणार आहे. माझ्या पूर्ण करिअरमध्ये मी कधीही अशा संघात गेलो नाही जिथे विराट किंवा रोहित नसतील. मी जे 50 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत त्यामध्ये रोहित किंवा विराट राहिलेला आहे.

या दोन्ही दिग्गजांच्या संघातून बाहेर झाल्याने आता संघात साई सुदर्शन आणि अभिमन्यू ईश्वरण या खेळाडूंना संधी देण्यात येत आहे. त्यामुळे या खेळाडूंकडे त्यांचे संघातील स्थान निश्चित करण्याची चांगली संधी असेल. ज्याबद्दल राहुलने म्हटले, त्या ड्रेसिंग रूममध्ये जाणे थोडे विचित्र वाटते. पण निश्चित स्वरूपात आपण त्यांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे. त्यांनी देशासाठी त्यांचं सर्वस्व दिलेलं आहे आणि आता ते भारतीय क्रिकेटचे दिग्गज म्हणून ओळखले जातील. तसेच आता बाकी खेळाडूंनी पुढे येण्याची वेळ आलेली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---