आयपीएल २०२१ मध्ये गतविजेत्या राहिलेल्या मुंबई इंडियन्सला शनिवारी (२ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सकडून चार विकेटने पराभव पत्करावा लागला. मुंबईला २० षटकांत १२९ धावांवर रोखल्यानंतर दिल्लीने १९.१ षटकांत सहा गडी गमावून १३२ धावा करून सामना जिंकला. या पराभवानंतर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या मुंबईच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.
प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी मुंबईला आता इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. कारण त्यांच्याकडे १२ सामन्यांत ५ विजयांसह केवळ १० गुण आहेत. गुणतालिकेमध्ये १० गुणांसह चार संघांमध्ये त्यांचा सर्वात कमी नेट रन रेट देखील आहे.
पण, दिल्लीकडून पराभव पत्करावा लागल्यानंतरही मुंबई संघ सामन्यानंतर खेळाडूंचे कौतुक करताना दिसला. मुंबई इंडियन्सने रविवारी त्यांच्या ड्रेसिंग रूमचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला, ज्यात संघ सामन्यानंतर एकत्र जमला.
व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्स त्यांचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईल यांना ड्रेसिंग रूममध्ये सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करताना दिसत आहे. सूर्यकुमारला प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि संघाचे मार्गदर्शक सचिन तेंडुलकर हे कुल्टर-नाईलला बॅच घालताना दिसत आहेत.
Dressing room Players of the Match award vs DC 👉 SKY & NCN#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 pic.twitter.com/mapIry9HSo
— Mumbai Indians (@mipaltan) October 3, 2021
सूर्यकुमारने दिल्लीविरुद्ध २६ चेंडूत ३३ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. याशिवाय कुल्टर-नाईलने चार षटकांत १९ धावा देऊन एक बळी घेतला. कुल्टर-नाईलने स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला बाद केले. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला आता उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि इतर संघांचे निकालही पाहावे लागतील. याशिवाय त्यांचा रनरेटही सुधारेल.
तत्पूर्वी, दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करू दिली नाही. मुंबईकडून या डावात सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईला दिल्ली संघाने अवघ्या १२९ धावांत रोखण्यात यश मिळवलं.
मुंबईने दिलेलं १३० धावांचं लक्ष्य दिल्लीच्या फलंदाजांनी चार गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केलं. दिल्लीकडून या सामन्यात श्रेयस अय्यरने चिवट फलंदाजी करत निर्णायक ३३ धावांची खेळी केली. त्याला आधी रिषभ पंतने २६ धावा करुन आणि रवीचंद्रन अश्विने २० धावा करुन चांगली साथ दिली.
मुंबई इंडियन्ससाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. कारण त्यांनी त्यांच्या ११ सामन्यांपैकी फक्त पाच सामने जिंकले होते आणि ते अजून प्लेऑफसाठी पात्र ठरलेले नव्हते. या पराभवानंतर त्यांचे प्लेऑफसाठी जाणे अवघड झाले आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. या विजयासह त्यांनी पहिल्या दोनमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑसी क्रिकेटरने स्म्रीती मंधनाचा बाउंड्री लाईनजवळ डाईव्ह मारत पकडला अद्भुत झेल, व्हिडिओ व्हायरल
Video: बाद असूनही पडिक्कलला तिसऱ्या पंचांनी ठरवले नाबाद; राहुलचा चढला पारा