गुरुवारी (२४ फेब्रुवारी) भारतीय महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ (INDW vs NZW) यांच्यात वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा (Fifth ODI) सामना पार पडला. भारतीय महिला संघातील ३ अनुभवी फलंदाज, कर्णधार मिताली राज (Mithali Raj), स्म्रीति मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्या अर्धशतकी खेळींच्या (Mithali Raj Fifty) जोरावर संघाने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. भारतीय संघाचा न्यूझीलंड दौऱ्यातील हा पहिलाच सामना विजय होता. या विजयासह पाहुण्या भारताने न्यूझीलंड दौऱ्याचा विजयासह शेवट केला आहे.
या सामन्यातील अर्धशतकी खेळीसह कर्णधार मिताली राज हिने मोठा विक्रम (Mithali Raj Created History) आपल्या नावावर केला आहे. ती वनडे क्रिकेटमध्ये कर्णधाराच्या रूपात सर्वाधिक ५० वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारी (Most 50+ Scores In ODI) पहिलीच महिला फलंदाज बनली आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या २५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद ५१ धावा केल्या होत्या. ६६ चेंडूंचा सामना करताना ६ चौकारांच्या मदतीने तिने या धावा जोडल्या होत्या.
मितालीनंतर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या विक्रमात इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने ३३ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
महिला वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा ५०+ धावा
५० – मिताली राज (भारत)
३३ – चार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड)
२९ – बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया)
२८ – सुझी बेट्स (न्यूझीलंड)
२३ – मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)
मार्च महिन्यात न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषकापूर्वी मिताली राजसहित भारतीय फलंदाजांच्या मोठ्या खेळी संघासाठी चांगले संकेत आहेत. मितालीने तिच्या वनडे कारकिर्दीत २२५ सामने खेळताना ६९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तिने वनडे क्रिकेटमध्ये ५१.८५ च्या सरासरीने ७६२३ धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमातही ती अव्वलस्थानी आहे.
मितलीबरोबरच न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात स्म्रीति मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांनीही अर्धशतके केली. स्म्रीतिने सलामीला फलंदाजीला येत ७१ धावांची शानदार खेळी केली. तर हरमनप्रीतने ६३ धावांचे योगदान दिले. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर भारतीय संघाला न्यूझीलंडमध्येच वनडे विश्वचषक खेळायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सरदार’ बनलेल्या कोहलीला पाहून चाहते क्रेझी, अनुष्काही नव्या लूकमध्ये कॅमेरात कैद; काय आहे प्रकरण?
…तर महिला विश्वचषकात ९ खेळाडूंसह देखील खेळवला जाणार सामना, आयसीसीने केला मोठा बदल
नवी इनिंग! ज्या दिल्लीकडून खेळला शेवटचा आयपीएल सामना, त्याच दिल्लीत आगरकरांचे पुनरागमन