पांरपरिक विरोधी संघ भारत आणि पाकिस्तान यांच्यात आधीसारख्या क्रिकेट मालिका होत नाहीत. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) स्पर्धांमध्येच एकत्र येतात. यामुळे या दोन्ही संघाच्या सामन्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. क्रिकेटविश्वातही याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते.
मागीलवर्षी झालेल्या टी२० विश्वचषकात हे दोन संघ आमने-सामने आले होते. या साखळी सामन्यात पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवानने बाबर आजमसोबत १५२ धावांची भागीदारी केली होती. हा सामना पाकिस्तानने १० विकेट्सने जिंकत विश्वचषकाच्या इतिहासात भारतावर प्रथमच विजय मिळवला होता.
यानंतर रिजवानने भारतीय संघाचा त्यावेळेचा कर्णधार विराट कोहलीची भेट घेतली होती. यावेळी त्याने भारतीय संघाचीही भेट घेऊन कौतुक करत ‘आम्ही एकच कुुटुंब’ आहोत असे म्हटले. त्याने वाहीद खानच्या यू ट्यूबवरच्या ‘क्रिकेट बाज’ या शोमध्ये कोहली आणि धोनीशी झालेल्या भेटीचे अनुभव सांगितले आहेत.
या शोमध्ये रिजवान म्हणाला, “कोहली हा आक्रमक खेळाडू आहे असे मी ऐकले होते. मात्र सामन्याआधी आणि नंतर माझी त्याच्याशी भेट झाली तेव्हा तो एक चांगला व्यक्ति आहे हे कळाले.”
रिजवानची ‘आमचा विराट कोहली’ ही कमेंटही चांगलीच व्हायरल झाली होती. याचे स्पष्टीकरण देताना तो म्हणाला, “क्रिकेटमध्ये आम्ही सगळे एकच कुटुंब आहोत. जर एक भाऊ विरोधी संघाकडून खेळत असेल, तर त्याला बाद करण्याचा प्रयत्न हा केलाच जातो कारण तुम्हाला तुमच्या संघासाठी चांगली कामगिरी करायची असते. मैदानात कोणीच स्टार नसतो सगळे एकाच स्तरावर खेळतात. मैदानावर आमच्यात कोणतेच नाते नसते, पण बाहेर आपण आमचा कोहली, आमचा स्मिथ किंवा आमचा पुजारा असे म्हणू शकतो, कारण आम्ही एक मोठे कुटुंब आहे.”
कोहली बरोबरच पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंनी एमएस धोनी याचीही भेट घेतली होती. “धोनीही एक उत्तम व्यक्तिमत्व आहे,” असे रिजवान म्हणाला.
रिजवान २०२१मध्ये टी२० क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. हा फॉर्म कायम राखत त्याने टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून अप्रतिम कामगिरी करत संघाच्या उपांत्यफेरीच्या प्रवासात महत्वाची भुमिका पार पाडली होती. तसेच तो काउंटी क्रिकेटमध्ये ससेक्स संघाकडून खेळला. या संघाकडून भारताचा कसोटी खेळाडू चेतेश्वर पुजाराही खेळला आहे. यावेळी रिजवानने पुजाराला सर्वात अधिक त्रास मीच दिला असेल. तरीही तो नेहमीच हसमुख दिसला, असे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये २०२२चा टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. यावेळी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. हा सामना २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यांची तिकीटे ही आधीच संपली आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऐकलंत का! पाकिस्तानच्या माजी कर्णधारालाही आहे विराटवर विश्वास; म्हणतोय, ‘तो क्रिकेटच्या भल्यासाठी…’
‘या’ पाकिस्तानी खेळाडूची मुलगी रुग्णालयात देतेय मृत्यूशी झुंज
भावाच्या बलिदानामुळेच आज ईशान भारतीय संघात खेळतोय, वाचा काय आहे संपूर्ण गोष्ट