बुधवारी (२३ जून) विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा समारोप झाला. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या या रोमांचक सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून बाजी मारली. १४४ वर्षानंतर कसोटी क्रिकेटला विश्वविजेता संघ मिळाला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला आहे. यानंतर इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने कोहलीबद्दल एक ट्वीट केले. परंतु ट्वीट करतेवेळी त्याने केलेल्या एका चुकीमुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
इंग्लंड संघाचा माजी गोलंदाज, मॉन्टी पानेसर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो खेळाडूंवर टीका आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ऐतिहासिक सामन्यानंतरही त्याने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. यावेळी भारतीय संघावर टीका किंवा त्यांच्यातील उणिवा न सांगता त्याने कोहलीला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरलेल्या, विराट कोहलीचा फोटो त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. यावर त्याने कॅप्शन म्हणून, “इंग्लंड दौऱ्यावरील उर्वरित सामन्यांसाठी शुभेच्छा, नेहमीच तू किंग कोहली राहशील,” असे लिहिले आहे.
या ट्विटमध्ये त्याने विराट कोहलीची पत्नी, अनुष्का शर्माला देखील टॅग केले आहे, ज्यामुळे चाहत्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.(Monty panesar troll on social media after he mentioned anushka Sharma’s name in his tweet)
Good luck for the rest of your trip in England and lots of runs for you. Always King Kohli @imVkohli @AnushkaSharma #WTCFinal #WTC2021 #WTCFinal21 #WTC21final pic.twitter.com/DqS9dnzkd8
— Monty Panesar (@zkp_scroll) June 23, 2021
मॉन्टी पानेसर होतोय ट्रोल
एका युजरने हे ट्विट रिट्विट करत लिहिले की, “मॉन्टीजी अनुष्का शर्माला टॅग करून तुम्हाला काय साध्य करायचं आहे.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तुम्ही या ट्विटमध्ये अनुष्का शर्माला का टॅग केले? अशी आशा व्यक्त करतो की, विलियमसनची बायको ट्विटरवर नसतानाही तुम्ही तिला टॅग कराल.”
Why is he tagging @AnushkaSharma 😅🤣🤣🤣 Monty ji kyaa something something 😅
— Thalapathy 💙 (@Thalapathy1995) June 24, 2021
https://twitter.com/Er_kumarharshit/status/1407767757219938306?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1407767757219938306%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-421016808189486674.ampproject.net%2F2106120107000%2Fframe.html
Why did you mentioned anushka 😂😂😂😂😂
— Shivdeep Sk37 (@ThoughtsOfShiv) June 24, 2021
विराट कोहलीचा फ्लॉप शो
भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४४ धावांची खेळी केली होती. परंतु दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याला अवघ्या १३ धावा करण्यात यश आले होते. ज्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. भारतीय संघाने दुसऱ्या डावात अवघ्या १७० धावा केल्या. न्यूझीलंड संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी अवघ्या १३९ धावांची आवश्यकता होती. हे आव्हान न्यूझीलंड संघाने पूर्ण करत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पाच मिलियन लोकसंख्येच्या देशाने, १.४ बिलीयनच्या देशाला धूळ चारली,’ वॉनचा भारताला टोमणा
‘ही’ एक गोष्ट शुभमन गिलला नडते, भारतीय दिग्गजाने साधला निशाणा
क्रिकेटसाठी ‘या’ खेळाडूनं दुखापतीवर दुर्लक्ष केलं, इंजेक्शन घेऊन मैदानात उतरला अन् इतिहासही रचला