भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीवर मागील अनेक दिवसांपासून टीका होत आहे. तो फलंदाजी करत असताना स्ट्राईक रोटेट करताना संघर्ष करताना दिसून येत आहे. याच कारणामुळे त्याच्यावर टीका होत आहे.
मंगळवारी(2 जूलै) बांगलादेश विरुद्धही त्याने शेवटच्या षटकात भुवनेश्वर बरोबर फलंदाजी करत असताना एकेरी धावा काढण्यास नकार दिला होता. तसेच तो शेवटच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने 33 चेंडूत 35 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीनंतर त्याला ट्रोल केले जात होते.
पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या खेळीला पाठिंबा दिला आहे. सचिन इंडिया टूडेशी बोलताना म्हणाला, ‘मला वाटते ती महत्त्वाची खेळी होती आणि त्याने संघासाठी जे योग्य आहे तेच केले. जर तो 50 व्या षटकाच्या शेवटपर्यंत थांबला असता तर तो त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या खेळाडूंना मदत करतो. त्याच्याकडून तीच अपेक्षा आहे आणि त्याने तेच केले.’
‘त्याच्यासाठी संघ महत्त्वाचा आहे. त्यावेळी ज्याची गरज आहे, ते त्याने केले पाहिजे आणि मंगळवारी त्याने तसेच केले.’
विशेष म्हणजे याआधी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात झालेल्या सामन्यात धोनीने केलेल्या धीम्या खेळीबद्दल, तसेच धोनी आणि केदार जाधवमध्ये झालेल्या धीम्या भागीदारीबद्दल सचिनने टीका केली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–पृथ्वी शाॅ दुखापतग्रस्त नसून या कारणामुळे संघाबाहेर?
–…म्हणून धोनी प्रत्येक सामन्यात बदलतोय बॅट
–काल निवृत्ती घेतलेल्या अंबाती रायडूला विराट कोहलीने अशा दिल्या शुभेच्छा