भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने २००८मध्ये झालेल्या निवडीच्या वादावर माजी कर्णधार एमएस धोनीचे समर्थन करत आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, धोनी आज जो काही आहे, ते केवळ त्याच्या निष्पक्ष विचार आणि निर्णयांमुळे आहे.
आरपी म्हणाला की, “धोनी (MS Dhoni) एक निष्पक्ष कर्णधार होता. तसेच त्यांच्या मैत्रीने धोनीच्या निर्णयांवर कधीच प्रभाव पडला नाही. धोनी आणि मी याबाबतीत चर्चा करत होतो की मला कुठे सुधारणा केली पाहिजे. मी चांगली कामगिरी करण्यासाठी काय केले पाहिजे.”
“मी धोनीला ओळखतो. मैत्री एक वेगळी गोष्ट आहे. परंतु देशाचे नेतृत्व करणे पूर्णपणे वेगळे आहे. मला वाटत होते की त्यावेळी त्याने माझ्या नावाची शिफारस केली. त्याला वाटले की मी चांगला खेळेल आणि रणनीतीवर चांगल्याप्रकारे काम करेल,” असेही तो यावेळी म्हणाला.
आरपी (RP Singh) म्हणाला की, “मला जितके खेळायचे होते, तितके खेळू शकलो नाही. कारण कदाचित माझा वेग कमी झाला आणि गोलंदाजीत स्विंगदेखील राहिला नव्हता. त्यावेळी सुधारणा केली असती तर आणखी खेळलो असतो. तरीही मी जे काही मिळवले आहे. त्याने मी खुश आहे.”
त्यावेळी झालेल्या निवडीप्रक्रियेच्या वादादरम्यान आरपीच्या जागी अष्टपैलू इरफान पठाणला (Irfan Pathan) संघात सामील करण्यात आले होते.
माध्यमांतील काही वृत्तांनुसार, २००८मध्ये इंग्लंडविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेसाठी धोनीला वाटत होते की, संघात आरपीची निवड व्हावी. परंतु निवडकर्त्यांनी इरफानला संधी दिली. त्यावेळी धोनी म्हणाला होता की, निवडीच्या बैठकीतील चर्चा बाहेर येणे ‘अपमानास्पद’ आहे.
आरपीने भारताकडून १४ कसोटी, ५८ वनडे आणि १० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-करार न केलेल्या खेळाडूंना परदेशी लीग खेळता यावीत म्हणून रैना-इरफानने सुचवले उपाय
-रोहित- रैना तयार केली सीएसके- मुंबईची मिळून जबरदस्त ड्रीम ११
-चहलने विचारलं असा काही प्रश्न, युवराज म्हणाला; रोहित- रैनाचे गाल पहा