आयपीएल २०२१ मध्ये शानदार सुरुवात केल्यानंतर मुंबई इंडियन्सची गाडी रुळावरून घसरलेली दिसत आहे. १९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात रोहित शर्माच्या संघाने सलग तीन सामने गमावले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने रविवारी (२७ सप्टेंबर) मुंबई इंडियन्सचा ५४ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर घसरला आहे. त्यांचे १० सामन्यांमध्ये ४ विजयांसह ८ गुण झाले आहेत.
आयपीएल २०२१ पहिल्या टप्प्यात पहिल्या दोन संघांच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स खंबीरपणे उभी राहिली होती आणि आता जेमतेम पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. एवढा फरक फक्त गेल्या तीन सामन्यात आला आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात मुंबईने त्यांचे ७ पैकी ४ सामने जिंकले होते. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी आपले तीनही सामने गमावले आहेत.
आयपीएल २०२१ ची सद्यस्थिती पाहता दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचण्याची खात्री आहे. विराट कोहलीच्या आरसीबीनेही प्लेऑफ गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. आरसीबीचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर ठामपणे उभा आहे. अशा परिस्थितीत, आता सर्वात जास्त उत्कंठा चौथ्या क्रमांकासाठी आहे. या स्थानासाठी, मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध कडवी टक्कर द्यावी लागणार आहे.
मुंबई, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या चारही संघांचे गुणतालिकेत ८ गुण झाले आहेत. मुंबई, कोलकाता, पंजाबने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. राजस्थानने ९ सामने खेळून आपले गुण ८ गाठले आहेत. राजस्थान संघ सध्या या चार संघांमध्ये सर्वोत्तम स्थानावर आहे.
कोलकाता नाईट रायडर्स ८ गुणांसह या चार संघांमध्ये गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. या चार संघांमध्ये हा एकमेव संघ आहे, ज्याचा रन रेट अधिक (+०.३२२) आहे. मुंबई, पंजाब आणि राजस्थानचा रन रेट मायनस आहे. मुंबई इंडियन्सची स्थिती सर्वात वाईट आहे कारण या चार संघांमध्ये त्यांचा सर्वात कमी रन रेट (-०.५५१) आहे.
मुंबई इंडियन्सला अजून चार सामने खेळायचे आहेत. यामध्ये त्यांचा सामना अनुक्रमे पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याशी होईल. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला या चारपैकी किमान तीन सामने जिंकावेच लागतील. मुंबई विरुद्ध पंजाब आणि मुंबई विरुद्ध राजस्थान हा करा किंवा मराचा सामना असेल कारण ते विजयी संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग सुलभ करतील, तर पराभूत संघांच्या पहिल्या चारसाठी आशा धुळीस मिळू शकतात. हैदराबादविरुद्धचा सामना मुंबई सहज जिंकू शकत नाही. हा संघ सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे, पण मुंबईसह इतर संघांचा खेळ बिघडवण्यास सक्षम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘त्याच्याकडे प्रतिभा आहे, पण काही वेळा डोक्याचा वापर करत नाही’, मॅक्सवेलवर माजी दिग्गजाची बोचरी टीका
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच