बातम्या क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. अत्यंत वाईट काळातून चाललेल्या श्रीलंका क्रिकेटसाठी भारताविरुद्धच्या मालिका संजीवनी म्हणून काम करतील असे बोलले जातेय. मात्र, खराब कामगिरी करत असलेल्या श्रीलंका संघातील काही खेळाडूंनी आपल्या कामगिरीने छाप पडली आहे. त्यापैकी एक असलेल्या अष्टपैलू वनिंदू हसरंगा याच्याबाबत श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
भारताविरुद्ध करत आहे दमदार कामगिरी
श्रीलंका संघाला भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला. तसेच टी२० मालिकेतील ते १-० ने पिछाडीवर आहेत. मात्र, असे असले तरी अविष्का फर्नांडो, चमिका करूणारत्ने, वनिंदू हसरंगा, दुष्मंता चमिरा व चरिथ असलंका या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. त्यापैकी हसरंगा हा मागील काही काळापासून श्रीलंका संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करतोय.
मुरलीधरन याचे महत्वपूर्ण विधान
हसरंगाच्या सातत्यपूर्ण कामगिरीने प्रभावित झालेला मुरलीधरनने त्याच्याबद्दल बोलताना म्हटले, “मला वाटते की आयपीएलमधील संघ हसरंगावर बोली लावतील. मात्र, त्याला अंतिम ११ मध्ये त्याला कितपत संधी मिळेल हे नक्की नाही. चार विदेशी खेळाडूंचा नियम असल्याने संघ भारतीय क्रिकेटपटूंना प्राधान्य देतात. तो अप्रतिम कामगिरी करत आहे. टी२० मध्ये तो एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येईल.”
पुढील आयपीएल हंगामात आणखी दोन संघ सामील होणार असल्याने आणखी विदेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये येण्याची संधी असेल.
अष्टपैलू आहे हसरंगा
तेवीस वर्षीय हसरंगा लेगस्पिन गोलंदाजीसोबत खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत आक्रमक फटके खेळण्यास प्रसिद्ध आहे. त्याने आत्तापर्यंत श्रीलंकेसाठी २० टी२० सामन्यांमध्ये २८ बळी मिळवले आहेत. याशिवाय त्याने श्रीलंकेचे २६ वनडे व ४ कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले असून, यामध्ये त्याला अनुक्रमे २५ व ४ बळी घेण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेची दुर्दशा! आकडेवारी पाहून तुम्हीही असेच म्हणाल
आशिष कुमारच्या पराभवासह पुरुष बॉक्सिंगमधील भारताच्या आशांना पूर्णविराम; चीनच्या बॉक्सरने दिली मात
जीवाभावाची मैत्री! फुटबॉल खेळताना दिसले रणवीर अन् माही, एकमेकांची गळाभेट घेत केली मस्ती